मुंबई

बीडीडी चाळींचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्याची घेणार भेट : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबईतील विविध ठिकाणच्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्पाच्या बाबतीत 31 ऑगस्टला भेट घेणार असल्याचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

म्हाडाच्या प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात वांद्रे येथील म्हाडा भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत आणि शिवसेनेचे इतर आमदार उपस्थित होते. येत्या 26 तारखेला याबाबतच्या सर्व प्रश्नांवर प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. 

गृहनिर्माण धोरण, बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास, म्हाडाच्या ५६ वसाहतींच्या पुनर्विकास, कॉर्पोस फंड, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न, सेवाशुल्क, संक्रमण शिबिरे या प्रलंबित प्रश्नांबाबत आदित्य यांनी शिवसेनेचे आमदार यांच्यासोबत चर्चा केली होती. गिरणी कामगारांना सोडतीमध्ये मिळालेली घरे १० वर्षांसाठी विकता येत नव्हती, मात्र आता ही अट शिथिल करून पाच वर्षांपर्यंत करण्यात येणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले. राज्यातील 15 वर्ष वास्तवाची अट आणि विक्री वेळी लागू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाने सुरू केला. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून हा पुनर्विकास पुढे सरकू शकलेला नाही. हा पुनर्विकास जलद गतीने व्हावा, यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे.

तसेच यामध्ये शिवडीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची कामे मार्गी लावणारा आहे. येथील बीडीडी चाळी या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असल्याने त्यांच्यासोबत पाठपुरावा करून लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आदित्य यावेळी म्हणाले.

तसेच गृहनिर्माण धोरणाची अंमलबजावणी करावी यासाठी पाठपुरावा करणार आहे. यासह गिरण्यांच्या जागेवर १ हजार ८०० संक्रमण शिबिरांमधील गाळे उपलब्ध होणार आहेत.

बीडीडी चाळींचा पुनर्विकास लवकर मार्गी लागावा, यासाठी राज्य शासनाने नुकतीच एक उच्चस्तरीय समिती बनवली आहे. या समितीमध्ये शिवसेनेच्या आमदारांना डावलण्यात आल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी पसरली आहे, याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता लोकांना मदत करायची आहे. बीडीडीतील रहिवासी चार वर्षे लोटल्यानंतरही संक्रमण शिबिरामध्ये का गेलेले नाही, यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असे ते यावेळी म्हणाले.

आरे कॉलनीतील कारशेडला विरोध कायम 

कुलाबा वांद्रे सिपझ या मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरेमध्ये कारशेड उभारण्यात येत आहे. या कारशेडला विरोध कायम असून, यापूर्वीही आम्ही कांजूरमार्गाचा पर्याय सुचवला होता, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT