मुंबई

मिरा-भाईंदर महापालिका करणार मालमत्ता कर माफ? महासभेत महत्वपुर्ण निर्णय अपेक्षित

संदीप पंडित


भाईंदर -  कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे मागील 4 महिन्यांच्या कालावधीत आर्थिक गर्तेत अडकलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. या नागरिकांना दिलासा देण्यासाठी उद्या 13 ऑगस्ट रोजीच्या मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 500 चौ.फुटापर्यंतच्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कर माफ करण्याचा तर 500 चौ.फुटापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या मालमत्ता कर धारकांना मालमत्ता करात 50 टक्के इतकी सवलत देण्याचा निर्णय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर पालिकेला यातून बाहेर निघण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार गीता जैन यांनी शासनाकडे केली आहे.

मिरा भाईंदर शहरात साडे तीन लाखाहून अधिक मालमत्ताधारक आहेत. यापैकी 50 ते 60 हजार मालमत्ताधारक हे वाणिज्य कार्यक्षेत्रात मोडतात उर्वरित मालमत्ताधारक हे निवासी करदाते म्हणून ओळखले जातात. मिरा भाईंदर महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी 271 कोटींचे उत्पन्न अपेक्षिले आहे. मात्र, या मालमत्ता करांची बिले वर्षातून दोन वेळा काढली जात असून पहिल्याच सहामाही कराची बिले वितरणाअभावी मुख्यालयात धुळ खात पडून आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता, पाणीपट्टी या विभागांसह सर्वच विभागातील कर्मचारी तथा अधिकारी वर्गांना याकामी जुंपले आहे. त्यामुळे मालमत्ता आणि पाणीपट्टी कराची वसूली केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारली जात आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यात मालमत्ता कराची वसूली केवळ दीड कोटी म्हणजेच 0.55 टक्के इतकीच झालेली आहे. पालिकेच्या उत्पन्नाचे महत्वाचे स्त्रोत असलेल्या या विभागाला अर्थकारणाच्या कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे पाणीपट्टीच्या ऑनलाईन वसूलीतून पहिल्या चार महिन्यातील 24 कोटींच्या उध्दीष्टापैकी 16 कोटीची म्हणजेच 67 टक्के इतकी वसूली झाली आहे. परंतु, दुसऱ्या टप्प्यातील पाणीपट्टींची बिले अदयापही कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे निघालेली नाहीत.

कोरोनामुळे मिरा भाईंदरकरांचे कंबरडे मोडले असून येथील नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना दररोज करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर शहरातील 500 चौ.फुटापर्यंतचे क्षेत्रफळ असलेल्या झोपडी तथा सदनिकाधारकांना या चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करातून वगळण्यात येणार आहे. तर 500 चौ.फुटापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या मालमत्ता कर धारकांना मालमत्ता करात 50 टक्क्यापर्यंतची सुट दिली जाणार आहे. ही सवलत केवळ या चालू आर्थिक वर्षापूर्तीच मर्यादित राहणार आहे. या कर सवलतीमुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळणार असला तरी मिरा भाईंदर महानगरपालिकेचे कंबरडे आर्थिकदृष्ट्या मोडले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या महानगरपालिकेला शासनाने आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी 145 मिरा भाईंदर विधानसभा क्षेत्रातील आमदार गीता जैन यांनी केली आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT