मुंबई

'साहब...हम फिरसे मुंबई नही आयेंगे', असं म्हणणारे श्रमिक पोटापाण्यासाठी पुन्हा मुंबईत येण्याच्या तयारीत

संजयघारपुरे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर काही दिवसातच स्थलांतरीत मजूर गावाकडे परत जाण्यासाठी आतूर होते, पुन्हा मुंबईत परतणर नाही असेच सांगत होते, पण आता तीच पावले, पुन्हा मुंबईकडे वळत आहेत. मुंबईत येणाऱ्या ट्रेन आरक्षणात आता वेटिंग लिस्ट सुरु झाली आहे.

लॉकडाऊन कालावधीत चालवण्यात आलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेन तसेच अन्य मार्गांनी सुमारे 18 लाख लोक राज्यातून गेल्याचे सांगितले जात होते. मुंबईतून दहा लाख स्थलांतरीत कामगार गेले होत. त्यातील सात लाख ट्रेनने गेले होते. मात्र आता त्यातील परतीचा प्रवास सुरु झाला आहे. कोरोना कालावधीतील स्पेशल ट्रेन सुरु झाल्या, त्यावेळी मुंबईतून जाणाऱ्या ट्रेन पूर्ण क्षमतेने जात होत्या, तर परतीच्या ट्रेन 70 टक्के क्षमतेनेच येत होत्या, पण आता या ट्रेन शंभर टक्के क्षमतेने परतत आहेत. मध्य रेल्वेद्वारे चार लाख तर पश्चिम रेल्वेद्वारे साडेतीन लाख लोक मुंबईत आले आहेत. 

उत्तर प्रदेशातून मुंबईत येणाऱ्या कामायनी तसेच महानगरी एक्सप्रसेची वेटिंग लीस्ट दीडशेपर्यंत गेली आहे. बारा ऑगस्टनंतर नियमीत रेल्वे सेवा सुरु झाली तर वेटिंग लीस्ट वाढेल. एवढेच नव्हे तर काही स्पेशल ट्रेन चालवणे भाग पडेल असाही अंदाज आहे.

मुंबईत चहाची टपरी असलेल्या कान्हाराम सिरोही यांनी मुलांच्या शाळा लवकरच सुरु होतील, त्यामुळे आम्ही लवकर परतलो असे सांगितले तर रिक्षाचालक असलेल्या संतोष यादवने मुंबईहून गावाकडे जाण्यासाठी पन्नास हजार खर्च झाले होते, पण काम तर मुंबईतच आहे असे त्याने सांगितले.

--------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

Latest Marathi News Live Update : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान

Shocking News : पती दारू पिऊन झोपी जायचा, दीर दूधात नशेचा पदार्थ मिसळून अत्याचार करायचा; सासरच्या छळाची पीडितेने सांगितली आपबीती

Nashik News : ८ महिन्यांपासून आमदारांचा निधी अडकला! ‘ई-समर्थ पोर्टल’च्या चाचणीमुळे विकासकामांवर 'ब्रेक', लोकप्रतिनिधींपुढे नवा पेच

SCROLL FOR NEXT