मुंबई : राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या संयुक्त मोहिमेंतर्गत पाच दिवसांपासून हजारो कामगारांना सुखरूप इच्छित स्थळी पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांनी अवैध व धोकादायक पद्धतीने प्रवास न करता एसटी बसमधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड्.अनिल परब यांनी केले आहे.
खासगी वाहनांतून अवैध पद्धतीने प्रवास करताना अनेक कामगारांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभागाने मोहीम अधिक तीव्र केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने भरारी पथके गावाकडे निघालेल्या कामगारांच शोध घेऊन तातडीने एसटी बसगाड्या उपलब्ध करून देत आहेत.
बुधवारी तब्बल 1200 एसटी बसगाड्यांमधून 27 हजार 528 कामगारांना इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवण्यात आले. पाच दिवसांत 72 हजार 956 कामगारांनी मोफत एसटी सेवेचा लाभ घेतला आहे, असे परब यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.