Worli Hit And Run Case esakal
मुंबई

Worli Hit And Run Case: मिहीर शहाला कोणी मदत केली? निबंध घेऊन जावा लागणार का? 60 तासानंतर अटक झाल्यामुळे ठाकरेंचा संताप

Worli Hit And Run Case Update: या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीचे वडिल राजेश शाह, आणि ड्रायव्हर राजऋषीला ताब्यात घेतले होते. मात्र सोमवारी संध्याकाळी कोर्टाने १५,००० रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर राजेश शाहला जामीन मंजूर केला.

Sandip Kapde

मुंबईच्या वरळीमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पोलिसांना मोठी यश मिळाली आहे. शहापूर येथून पोलिसांनी मुख्य आरोपी मिहीर शाहला अटक केली आहे. मिहीर शाह हाच तो व्यक्ती आहे. ज्याच्या गाडीच्या धडकेत एक महिलेचा मृत्यू झाला होता. रविवारी सकाळी झालेल्या या अपघातानंतर मिहीर फरार झाला होता आणि त्यानंतर पोलिस त्याच्या शोधात होते. पोलिसांनी सांगितले होते की, मिहीरने पळण्यापूर्वी आपली कार बांद्रात सोडली होती आणि ड्रायव्हर राजऋषीला काला नगरजवळ सोडून गेला होता. त्यानंतर राजऋषी ऑटो-रिक्शाने बोरिवलीला आला होता.

या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीचे वडिल राजेश शाह, आणि ड्रायव्हर राजऋषीला ताब्यात घेतले होते. मात्र सोमवारी संध्याकाळी कोर्टाने १५,००० रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर राजेश शाहला जामीन मंजूर केला. मिहीर घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांना अटक केली होती, ज्यांनी नंतर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने त्यांना जामीन दिला.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी विचारले की मिहीर शाहला अटकेला उशीर का झाला? त्यांनी सांगितले की, मच्छिमार महिला गंभीरपणे जखमी झाली आणि कारने तिला फरफटत नेले. शिवाय, मिहीर शाहला अटक करण्यात का विलंब झाला यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांवर आरोप-

आदित्य ठाकरे यांनी तीन दिवसांमध्ये अनेक मुद्द्यांवर ताशेरे ओढले. मुख्यमंत्र्यांनी विविध गोष्टींवर कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरीही, मूळ आरोपी मिहीर राजेश शहाच्या अटकेस उशीर का झाला?, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

ठाकरे म्हणाले की, "आमच्याकडे कोळीवाड्यात महिलेला उडवलं, फरफटत नेलं आणि परत गाडीने दुसऱ्यांदा उडवलं. हे भयानक आहे. गृह खातं कार्यरत आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे."

मिहीर शहाच्या अटकेचा प्रश्न-

मिहीर शहाला अटक करण्यात का उशीर झाला, असा प्रश्न उपस्थित करून ठाकरे म्हणाले, "मिहीर शहाला खोके सरकारने का पकडले नाही? किती दिवस लागणार? गृह खातं काय करतंय?" तसेच, त्यांनी गृहमंत्र्यांवर जोरदार टीका केली.

हिट ॲंड रन की मर्डर?

नाकवा जी यांनी हिट ॲंड रन प्रकरणाचे वर्णन करताना म्हटले की, "हे मर्डर आहे. सीसीटीव्ही समोर आलेत, फरफटत नेलं आणि ड्रायव्हर बदलून पुन्हा चिरडण्यात आले." ठाकरे यांनी विचारलं की, "या कारवाईसाठी ६० तास का लागले? कोणी त्यांना मदत करत होते का?" त्यांनी पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आणि म्हटले की, "गृह खात काय करतेय, ते का उत्तर देत नाही? आम्हाला निबंध घेऊन जावा लागणार का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT