crime
crime 
मुंबई

प्रेमभंग झाल्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

शहापूर : प्रेयसीकडून प्रियकराचा प्रेमभंग झाल्याप्रकरणी शहापुरातील एका 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चक्क फेसबुकवर आपण प्रेमभंग झाल्याने आत्महत्या करत असल्याचा मॅसेज व्हायरल केला. यात त्याने थेट प्रेयसीला जबाबदार धरले आहे.

तालुक्यातील किन्हवली पोलिस ठाण्याचे हद्दीतील अस्नोली येथील राजेश हरी दिनकर या 28 वर्षीय तरुणाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली. अंबरनाथ येथील एलजी कंपनीत कामाला असलेल्या राजेशचे मागील दोन वर्षांपासुन तरुणीसोबत प्रेम प्रकरण असल्याचे बोलले जात असुन प्रेयसीकडुन प्रियकर राजेशचा प्रेमभंग झाल्याने त्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आत्महत्येपूर्वी राजेश याने सोशल मिडीयावर प्रेयसी सोबतचा केक कापतानाचा फोटो व्हायरल केला असुन त्यासोबत त्याने प्रेम भंगातुन आत्महत्या करत असल्याचे सांगत प्रेयसीला जबाबदार धरले आहे. याबाबत किन्हवली पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली. राजेशचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT