Sri Sri Ravishankar Sakal
myfa

चेतना तरंग : खोटे बोलणारा निष्पाप असतो

तुमच्या ओळखीचा एक स्नेही तुमच्याशी खोटे बोलतो आणि ते तुमच्या लक्षात येते. तुम्हाला अशा वेळी काय वाटेल?

श्री श्री रविशंकर, प्रणेते आर्ट ऑफ लिव्हिंग

तुमच्या ओळखीचा एक स्नेही तुमच्याशी खोटे बोलतो आणि ते तुमच्या लक्षात येते. तुम्हाला अशा वेळी काय वाटेल?

  • १. दुःख

  • २. क्रोध

  • ३. फसगतीची जाणीव

  • ४. निराशा

  • ५. करुणा

  • ६. भ्रमनिरास

  • ७. अनादराची भावना

  • ८. आश्चर्य

  • ९. धक्का

  • १०. लाज

काही दिवसांपूर्वी कुणीतरी माझ्याशी खोटे बोलले. त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि त्याच्याबद्दल प्रेम वाढले. कारण, ती व्यक्ती एक चतुर खोटारडी नव्हती. जर ती चाणाक्ष खोटारडी असती, तर तिचे खोटे बोलणे माझ्या ध्यानातच आले नसते. ती इतका निष्पाप आणि निष्कपट होती की, तिला चांगले खोटे बोलता येत नव्हते. तिचे खोटे लगेच उघडे पडले. जर ती पकडली गेली नसती, तर ती खोटारडी आहे, हे कसे कळले असते?

म्हणजेच तुम्ही एक चाणाक्ष खोटारडा पकडू शकत नाही. ज्याला तुम्ही खोटारडा म्हणून ओळखता, तो हुशार खोटारडा नाहीच. तो तर साधा भोळा, निष्पाप आहे. होय ना?

म्हणून वर यादी केलेल्या सर्व मानसिक कसरती न करता त्या खोट्या व्यक्तीसाठी प्रेमात विरघळून जा!

आपण किती भाग्यवान आहोत?...

ही एकच बाब नेहमी स्मरणात असू द्या. जेव्हा तुम्हाला तुमच्या भाग्याचे विस्मरण होईल, तेव्हा तुम्ही दुःखी व्हाल. दुःख सांगते की...

१) तुम्ही नकारात्मक गुणांचा संग केला आहे आणि

२) तुम्ही सकारात्मक गुणांचा संग केला आहे!

तुमचे दुर्गुण तुम्हाला दुःखात लोटतात. तसेच तुम्ही किती महान आहात, किती सगुणांनी परिपूर्ण आहात, याची जाणीव कधी कधी तुम्हाला दुसऱ्यांना दोष देण्यास उद्युक्त करते. तुम्ही दुसऱ्याला तुच्छ मानू लागलात, की दुःखी व्हाल.

परंतु अशा दुःखामुळेच तुम्हाला तुमच्या आत्म्याकडे परत येणे शक्य होईल. आत्मा तर पूर्ण आनंदच आहे, पण याची जाणीव केवळ ज्ञानोपासनेमुळेच होऊ शकते. अशी जाणीव अथवा हे ज्ञान दुःखाचे बोट धरून त्याला आत्म्याकडे नेते. ज्ञानाशिवाय दुःख पूर्णत्वाकडे न जाता वाढत जाते. ज्ञानाने मात्र दुःखाला पूर्णत्व येते. केवळ ज्ञानाच्या शक्तीमुळे आपण दुःखाला ओलांडून पलीकडे जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT