sadguru
sadguru 
myfa

इनर इंजिनिअरिंग : मनाच्या कल्पनेत नको, सृष्टीकर्त्याच्या सृष्टीत जगा 

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

तुमच्या मनात जे काही घडते ती तुमची कल्पना आहे. त्याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. म्हणजे हे जग नियंत्रणाबाहेर गेलेले नसून, खरे पाहता तुमची कल्पना नियंत्रणाबाहेर गेली आहे. तुमच्या मनात जे घडते ते तुमच्या नियंत्रणात नसते, म्हणूनच तुमच्या आनंदात आणि तुमच्या दु:खात सतत चढउतार चालूच असतो, कारण तुमच्या सभोवताली जे घडत आहे त्याला सतत तुमची अनिवार्य प्रतिक्रिया चालूच असते. तुम्हाला हवे तसे हे जग तुम्ही चालवू शकत नाही, तर किमान तुमचे स्वप्न तरी तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे घडवायला हवे. असे असेल तर मग तुम्ही स्वाभाविकपणे स्वतःला अगदी प्रसन्न आणि खूप छान ठेवाल. योग विज्ञानात आपण माणूस आजारी आहे म्हणतो, हे केवळ याच कारणासाठी की त्याला स्थिर कसे राहायचे हेच माहिती नाही. तुमची मानसिक कृती सतत चालूच असते. अशा स्थितीत, तुम्हाला काहीच समजणार नाही. तुम्ही विचार करता, ती फक्त मानसिक प्रक्रिया आहे, ती काही अस्तित्वाशी संबंधित वास्तविक प्रक्रिया नव्हे. तिचा वास्तविकतेशी काडीमात्र संबंध असावा, हे गरजेचे नाही. तुम्ही आत्ता ज्याप्रकारे विचार करता, हे मुख्यतः सामाजिक प्रभावच याला चालना देत आहेत; कारण मानवी मन हे फक्त केवळ बाहेरचे अनुकरण करत असते. याच प्रकारे संस्कृती, परंपरा, धर्म आणि विश्वास प्रणाली तयार केल्या जातात.

एकदा तुम्ही अनुकरण करू लागल्यावर तुमचे जीवन जसे आहे तसे जाणून घेण्याची आणि त्याकडे बघण्याची क्षमता हरवून बसता. आकलन म्हणजे सर्व काही ते जसे आहे तसे बघणे, कुठल्याही गोष्टीबद्दल मत किंवा कल्पना मांडून त्यांना विकृत करणे नव्हे. तुम्ही अनुकरण करता, तेव्हा तुम्ही असे गृहीत धरता की भूतकाळात लोकांनी याचे जाणून घेतले होते आणि ते योग्यच असेल. यामुळे सामाजिकदृष्ट्या तुम्हाला हे फार सोयीस्कर होते, कारण मग तुम्ही त्या सामाजिक संस्कृतीत चांगले फिट झालेले असता, परंतु यामुळे जीवनाचा सखोल अनुभव घेता येणार नाही. असे केल्याने आध्यात्मिक स्वरुपाचे असे काहीही मनुष्याच्या जीवनात उतरणार नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत, आम्ही तुमच्या विचारांना जास्त महत्त्व दिलेले नाही. तुम्ही काय विचार करता त्याची आम्ही जास्त पर्वा करत नाही. पण पाश्चिमात्य संस्कृतीत, कुणीतरी तुम्हाला सांगितले, ‘‘मी विचार करतो, म्हणून मी अस्तित्वात आहे.’’ हा मूर्खपणा आहे. तुम्ही अस्तित्वात आहात म्हणूनच तुम्ही विचार करू शकता, नाही का? परंतु या विचार प्रक्रियेला अनावश्यकपणे इतके महत्त्व दिले गेले आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्षुल्लक कल्पनाविश्वात – अर्थात तुमचे विचार आणि कल्पना - इतके भारावून गेला आहात की, तुम्ही या सृष्टीकर्त्याची रचना पूर्णपणे चुकवून बसलात. हेच तुमच्या अस्तित्वाचे तथ्य आहे. ब्रम्हांडाची भव्यता मानवी मनात उतरलीच नाहीये. आता याक्षणी विश्वाच्या अद्‌भूत घडवणुकीपेक्षा तुमचे विचार आणि तुम्हाला काय वाटते, हेच अत्याधिक महत्त्वाचे आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

म्हणून, तुम्हाला या अस्तित्वाचे स्वरूप समजून घ्यायचे असेल– म्हणजे सृष्टीकर्त्याच्या रचनेचे, तुम्ही घडवलेले नव्हे - तर तुम्ही तुमची काल्पनिक रचना बाजूला सारली पाहिजे, कारण त्याचा काही उपयोग नाही. नाहीतर, तुम्ही तुमचे सबंध आयुष्य तुमच्या कल्पनेच्या रचनेत धडपडत राहाल, पण ती तुम्हाला कुठेच घेऊन जाणार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT