file photo 
नांदेड

नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी १२६ जण रिंगणात

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची सोमवारी (ता. आठ) छाननी करण्यात आली. यात एकूण १७ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरल्याने हे निवडणुकीतून बाद ठरले आहेत. या छाननी प्रक्रियेत एकूण १२६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. परंतु यापैकी किती उमेदवार निवडणूक रिंगणातून पळ काढतात हे येत्या काही दिवसात कळणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण १४३ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया सोमवार (ता. आठ) मार्च रोजी पूर्ण करण्यात आली. यात संजय प्रकाश कुरे, लक्ष्मण दिलीप देवगुंडे, निलेश शिवराज लखमपुरे, सुदर्शन माधव धर्माधिकारी, मारुती नरसिंग जाधव, उत्तम किशन जाधव, रुक्‍मीनबाई दिगंबर ढगे, विक्रम श्रीधर देशमुख, नारायण धारबाजी दराडे, दत्तराव लालूजी मोहिते, बंडू शामराव भुसारे, कांताबाई बालासाहेब जोगदंड, रेखाबाई वेंकट फुलारे, मोहन माधव पाटील, नागनाथ सदाशिव सुरनर यांचे नामनिर्देशन पत्र छाननी प्रक्रियेत उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी अवैध ठरवले आहे.

नारायण दराडे व मोहन माधव पाटील यांनी प्रत्येकी दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले होते त्यांचे दोन्हीच्या दोन्ही नामनिर्देशन पत्र अवैध ठरले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकूण १४३ नामनिर्देशनपत्रा पैकी १७ उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने अर्थात हे उमेदवार निवडणूक रिंगणातून बाद झाले आहेत. निवडणुकीच्या मैदानात आता १२६ उमेदवार उरले आहेत. परंतु मंगळवार (ता. नऊ) मार्चपासून नामनिर्देशन पत्र माघारी घेता येणार आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणातून किती उमेदवार पळ करतात हे पाहणे महत्त्वाचे झाले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT