File photo 
नांदेड

पोलिसांसह आरोग्य विभागाचीही होतेय दमछाक, कशामुळे? ते वाचाच 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरातील काही मर्यादित भागातच कोरोनाचा प्रभाव होता. आता मात्र कोरोनाने सर्वत्र आपले बस्तान मांडायला सुरुवात केली आहे. या आजाराने नवीन भागात प्रवेश केला असून चौफाळा, मालेगाव रोड, फरांदेनगर, सिडको व खोजा कॉलनी भागात कोरोनाने आपले हातपाय पसरवले आहे.

धोक्याची घंटा 
शहरातील वेगवेगळ्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने ही नांदेडकरांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. शहराचे व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच लोकांकडून पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने आपण स्वतःहून कोरोनाला आमंत्रण देत आहोत असे दिसते. नियम काटेकोरपणे न पाळल्यास त्याचे परिणाम कोणी एका दुसऱ्याला नाही तर सर्वानाच भोगावे लागणार आहेत, हे मात्र नांदेडकरांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे.

पाचशे रुपयासाठी लांबच्या लांब रांगा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जनधन खात्यात जमा केलेले पाचशे रुपये काढण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी अनेक किलोमीटरची पायपीट करून बॅंक गाठत आहेत.  पण तब्बल दोन-दोन तास ताटकळत बसावे लागत असून फिजिकल डिस्टन्सिंग लावण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. परिणामी सर्वत्रच फिजिकल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लाॅकडाउन करण्यात आल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटाला सामना करावा लागत आहे. सध्या गरिबांच्या जनधन खात्यात शासनाने रक्कम जमा केल्याने सदरील रक्कम उचलण्यासाठी ग्रामीण भागातील खातेदार शहरातील विविध बॅंकांसमोर मोठी गर्दी करत आहेत. या पैशांसाठी अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करून आणि तब्बल दोन तास बॅंकेच्या समोर असलेल्या रांगेत ताटकळत उभे राहण्याची वेळ येत आहे.   

हक्काची रक्कम काढण्यासाठी कसरत
विशेष म्हणजे या रांगांमध्ये वयोवृद्ध महिलांची संख्या अधिक प्रमाणात आहे. बॅंकेसमोरील गर्दी कमी करण्यासाठी आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी प्रशासनाला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. लाॅकडाउनच्या काळात ना रेल्वे, ना बस, ना कसल्याच प्रकारची वाहतूक सुविधा. यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना केवळ पायपीट करत आपल्या खात्यावरील हक्काची रक्कम काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पाण्याची व्यवस्थाच नाही
शेकडो ग्राहकांची बॅंकांसमोर दररोजच रांगा लागत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे ग्राहक तहानेने व्याकुळ होत आहेत. परंतु, काही बॅंकांबाहेर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. तसेच उन-पावसापासून बचाव व्हावा म्हणून काही बॅंक प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली नसल्याचे ग्राहकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT