bhagat singh koshyari bhagat singh koshyari
नांदेड

'लोकांमध्ये मिसळल्यावरच नवीन गोष्टी शिकायला भेटतात'

राज्यपालपदाची सुत्रे हाती घेतल्यापासूनच श्री गुरुगोविंद सिंगजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत येण्याची खूप इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे, असे मत राज्यपाल भगतसिंघ कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

राज्यपालपदाची सुत्रे हाती घेतल्यापासूनच श्री गुरुगोविंद सिंगजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत येण्याची खूप इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे, असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले.

नांदेड: छत्रपती शिवाजी महाराज, श्री गुरु गोविंदसिंगजी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे महापुरुष माझ्यासाठी राम, कृष्ण या दैवताप्रमाणे आहेत. सद्यस्थितीत सर्वच महापुरुषांच्या बलिदानाचा विसर पडत चालला आहे, हे दुर्दैव आहे, अशी खंत व्यक्त करून मला लोकांमध्ये मिसळून रहायला आवडते. लोकांमध्ये गेल्यावरच अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात कुठे जाता आले नाही. राज्यपालपदाची सुत्रे हाती घेतल्यापासूनच श्री गुरुगोविंद सिंगजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत येण्याची खूप इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे, असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक, व्यवस्थापन समिती सदस्यांना मार्गदर्शनप्रसंगी गुरुवारी (ता. पाच) ते बोलत होते. राज्यपाल कोश्यारी विमानतळावर उतरल्यानंतर थेट विद्यापीठात पोहोचले. तेथे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज्यपालांना विविध विकासकामांची चित्रफीत दाखविण्यासाठी विद्यापीठात जय्यत तयारी केली होती. पण ऐनवेळी राज्यपालांनी मला समोरच्या इमारतीवरून परिसर पाहायचा आहे. चित्रफीत नंतर दाखवली तरी चालेल, असे म्हटल्याने विद्यापीठाचे नियोजन बिघडले. परिसर बघून आज मैं बहोत खुश हुआ, अशा शब्दात प्रतिक्रिया देत विद्यापीठातील महिला कर्मचाऱ्यांसोबत सेल्फीचा आनंदही त्यांनी घेतला.

दौऱ्यावर कोण राजकारण करतय...
राज्यपाल भगतसिंघ कोश्यारी यांच्या तीन जिल्ह्यातील दौऱ्याला राष्ट्रवादी कॉँग्रेसने विरोध दर्शविला. याबाबत राज्यपाल यांना पत्रकारांनी विचारले असता, कोण राजकारण करीत आहेत. तुम्ही तर करत नाही ना?, असा उलट प्रश्न पत्रकारांना करून या विषयावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

बंदमुळे व्यापारी झाले संतप्त
राज्यपाल जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दुकाने, छोटे व्यापारी, खाण्यापिण्याचे पदार्थ, फळांचे गाडे यांना पोलिसांनी चार वाजेपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले होते. कालच दुकाने बंद ठेवण्याची कल्पना दिली असती तर आम्ही तशी तयारी केली असती. एवढे नुकसान झाले नसते, अशा संतप्त प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Google Gemini AI Photo Prompt: तेच ते प्रॉम्प्ट वापरून कंटाळला आहात? सुंदर फोटोसाठी स्वत:च बनवा 'असे' क्रिएटिव्ह प्रॉम्प्ट

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT