file photo
file photo 
नांदेड

माहूर तालुक्यातील पापलवाडी येथील "त्या"  कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच! राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाळचा अहवाल पॉझिटिव्ह 

साजीद खान

माहूर (जिल्हा नांदेड) : माहुर तालुक्यातील पापलवाडी येथे (ता. ११)रोजी तीन कावळे व चार कोंबड्या चा संशयास्पद मृत्यू झाल्याने पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन नेमका या पक्षाचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने की अन्य रोगाने झाला याचा तपास करण्यासाठी त्या मृत पक्षाचे नमुने चाचणीकरिता भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्या पक्ष्यांचा नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचा निष्कर्ष आहे.

माहूर तालुक्यातील आष्टा पशुवैद्यकीय दवाखान्यात अंतर्गत येणाऱ्या पालवाडी शिवारात तीन कावळे व चार कोंबड्या चा मृत्यू झाल्याची घटना (ता. ११) जानेवारी रोजी समोर आली होती.पशुवैद्यकीय पथक तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन ते मृत पक्षी ताब्यात घेऊन या पक्षाचा नेमका मृत्त्यु कशामुळे झाला याची खातरजमा करण्यासाठी नमुने तपासणी करीता पश्चिम विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा,पुणे तसेच राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते.जिल्हा प्रशासनाला (ता.१५)रोजी उशिरा अहवाल प्राप्त झाला असून पापलवाडी येथील मृत्यु झालेल्या कोंबड्यांना H5N1+ve बर्ड फ्ल्यू रोग पॉझिटिव्ह असल्याचा निष्कर्ष असलेला अहवाल प्राप्त झाला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर तालुका प्रशासन लागले कामाला

मौजे पापलवाडी येथे बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदान लागल्या नंतर रोगाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आधीच जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार पापलवाडी व परिसरातील दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या आदेशा नुसार अलर्ट झोन घोषित करून प्रतिबंधक उपाय म्हणून पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आज पापलवाडी येथे पक्षी नष्ट करण्यात येणार आहेत.

H5N1 इन्फ्लूएन्झा म्हणजे काय?

बर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या म्हणण्यानुसार एच5एन1हा इन्फ्लूएंझा व्हायरसचा एक प्रकार आहे.ज्यामुळे पक्ष्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा "बर्ड फ्लू" नावाचा अत्यंत संसर्गजन्य,गंभीर श्वसन रोग होतो.एच5एन1 एव्हीयन इन्फ्लूएन्झाची मानवी प्रकरणे अधूनमधून आढळतात,परंतु संसर्ग एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे अवघड आहे.जेव्हा लोक संसर्गित होतात,तेंव्हा मृत्युदर साधारणतः६० टक्के एवढा असतो.

चिकन आणि इतर वन्य पक्षी खाणे सुरक्षित आहे काय?

होय,योग्य प्रकारे तयार केलेले आणि शिजवलेले मांसल आणि वन्य पक्षी खाणे सुरक्षित आहे.विषाणू उष्णतेस संवेदनशील आहे. स्वयंपाक करण्यासाठी वापरलेले सामान्य तापमान जेणेकरून अन्नाच्या सर्व भागांत ७० डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचेल तर व्हायरस नष्ट होईल. प्रमाणित खबरदारी म्हणून डब्ल्यूएचओने शिफारस केली आहे की मांसल आणि वन्य पक्षी,कोंबडीचे मांस योग्य प्रकारे शिजले पाहिजे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT