File photo 
नांदेड

Video - देशाला आहे कुशल मनुष्यबळाची गरज - डॉ. हनुमंत भोपाळे 

प्रमोद चौधरी

नांदेड : जगाची, देशाची गरज लक्षात घेऊन कुशल आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण केले तर निश्चितच अनेक प्रश्रांची उकल सहजपणे होऊ शकते. सक्षम आणि कुशल मनुष्यबळ देशाला उन्नत करत असते. असं मनुष्य बळ निर्माण करण्यासाठी व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष परिश्रम घेतले पाहिजे. वैज्ञानिक आणि सकारात्मक दृष्टिकोन रूजवला पाहिजे. यामुळे अंधश्रद्धाळू आणि नकारात्मक मनुष्यबळ तयार होणार नाही.

अंधश्रध्द माणसं आपल्या विकासाच्या अपेक्षेने हाताच्या रेषा दाखवत बसतात. अशानं विकास होत नाही. अशा अंधश्रद्धा प्रकारामुळे हताश होऊन बसण्याची वेळ मात्र येते. प्रश्नांची योग्य उकल झाल्याशिवाय विकास गतिमान होऊ शकत नाही. प्रश्र्न सोडविण्याचे कौशल्य शिकवले पाहिजे. प्रश्न सोडविणारे विकास करतात अन् विकास करणारे माणसं कोणत्याही देशाचे वैभव असते. दगडं नाही तर माणसंच देशाच्या वैभवाची निर्मिती करण्यात मोलाची भूमिका बजावतात. म्हणून माणसं घडविण्यासाठी दर्जेदार स्वरूपाच्या शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांची गरज आहे.

आज जागतिक दर्जाच्या शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांची आपल्या देशात फार मोठी उणीव आहे. ती भरून काढण्यासाठी जागतिक दर्जाच्या शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांची निर्मिती केली पाहिजे. केवळ पुस्तकी ज्ञानच देऊन थांबलो तर विकासाची प्रक्रिया गतिमान होणार नाही. कसं पोहायला पाहिजे, यावरचे धडे पाठ करून शंभर पैकी शंभर मार्क घेणा-या विद्यार्थ्यांना पोहताच येत नसेल तर या मार्काचा काय उपयोग? 

भावना हाताळण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवले, तसं त्यांना प्रशिक्षण दिले तर भावनिक बुद्धिवान विद्यार्थी तयार होतील. ते मनानं प्रसन्न, आनंदी आणि समाधानी असतील. त्यांच्या रोमारोमात उत्साह, आत्मविश्वास आणि कार्यमग्नता दिसून येईल. भावनिक बुद्धिमत्ता संपादन केलेली माणसं समाजाला दुःख मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतात.  प्रश्न सोडवण्यासाठी तरबेजपणा यावा यासाठी प्रयोगशील, उपक्रमशील, दर्जेदार  शिक्षण आणि प्रशिक्षण असायला पाहिजे. 

समस्यांची जाणीव होताच ती समस्या कशी सोडवता येईल या अनुषंगाने डोकं लढवणारी माणसं असतील तर नक्कीच समस्यांची सोडवणूक होते. त्यासाठी केवळ मार्कासाठी शिक्षण घेणारे आणि मार्क सीट देणारे म्हणजेच प्रमाणपत्र वाटप करणारी महाविद्यालयं, विद्यापीठं जागतिक स्पर्धेत टिकू शकत नाहीत. असे होऊ यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयाने यासंदर्भात  विचार करून उपकारक उपक्रम राबविले पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT