File photo
File photo 
नांदेड

शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास होतोय अधिकच घट्ट, काय कारण? वाचाच

प्रमोद चौधरी

नांदेड : शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे ऐकताच अंगावर शहारे उभे राहतात. कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकवेल अशी ती घटना असते. त्या शेतकरी कुटुंबातील भयानक आर्त कल्लोळ मन छिन्न-विछिन्न करून सोडतो. जीवनाचा थांग हरवून टाकणाऱ्या या शेतकरी आत्महत्येचा फास सैल होण्याचे नावच घेत नाही. शासकीय धोरण आणि नैसर्गिक प्रकोपात अजून तो अधिकच घट्ट होत चालला आहे. एकंदरीतच शासकीय धोरण अन निसर्गाच्या प्रकोपात शेतकऱ्याच्या गळ्याचा फास घट्ट होत चालला आहे.

१९९१ पासून निसर्गचक्रामध्ये झालेला बदल, त्यामुळे सातत्याने पाण्याचा दुष्काळ, नापिकी आणि उत्पादकतेतवर झालेला परिणाम यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील धणगीला उकरीच लागली आहे. मध्यंतरी पावसाचा लाभ होऊन शेती पिकली तरीसुद्धा बाजारपेठेत मिळणारा कमकुवत भाव आणि आयात-निर्यात, हमीभाव, शासकीय धान्य खरेदी केंद्रांवरील घोळ, उदासीन व भ्रष्ट यंत्रणेपायी शेतकरी योजनांचा होणारा बट्ट्याबोळ यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच मुस्कटदाबी होत आहे.

यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पिकेही चांगलीच बहरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु, हाता-तोंडाशी आलेली पिके पावसाने हिरावली. आहे त्या पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने नेस्तनाबूत झाल्याने केवळ शेती व्यवसायावर निर्भर असणारे कुटुंब हतबल झाले आहेत. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शासकीय योजना आहेत, मात्र त्याचा लाभ कोरडवाडू शेतकऱ्यांना होण्याऐवजी सधन भागातील शेतकऱ्यांनाच अधिक होत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.  

वाढत्या शेतकरी आत्महत्येला सर्वस्वी कारण म्हणजे शासनाचे शेतकरी विरोधी धोरण व कायदे. केवळ निसर्गचक्रावर दोष देऊन होणार नाही, संकटकाळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार नसून, उलट फसव्या घोषणा करून, त्यांचे मानसिक, आर्थिक शोषण करीत आहे. मानसिक, सामाजिक व आर्थिक असा एकत्रित तणाव शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास बनला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवनाथ कोरडे यांनी सांगितले.

शेतीपूरक व्यवसायाला चालना द्यावी
केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शेतीला पूरक असा व्यवसाय करून आत्मनिर्भर बनण्याची आज गरज आहे. कारण शेतमाला रास्त भाव मिळत नसल्याने, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे आर्थिक संकटापायी शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे टाळण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने, कृषी विभागाने पुढाकार घ्यायला पाहिजे.
- प्रा. सुनिता सुक्रे, नांदेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT