chilli.jpeg 
नांदेड

येथील मिरचीतोड मजुरांची फरफट थांबणार

हफीज घडीवाला


कंधार, (जि. नांदेड) ः लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकून पडलेल्या कामगार, विद्यार्थी, पर्यटक आणि भाविकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेल्या कंधारसह लोहा व मुखेड तालुक्यातील अडीच हजाराच्या आसपास मजुरांची फरफट थांबण्याचे चिन्ह आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयाने उपासमारीचा सामना करणाऱ्या या मिरचीतोड मजुरांचा परतीचा मार्ग मोकळा आता झाला आहे.

कंधार व लोहा तालुक्यातुन दरवर्षी तेलंगणातील खम्मम येथे हजारो मजूर मिरची तोडण्यासाठी जातात. यावर्षी रामानाईकतांडा, कुरुळा, देवळातांडा, ढाकुतांडा, पटाचातांडा, हिरामणतांडा, सोनमाळतांडा आदी गावातील अडीच हजाराच्या आसपास मजूर मिरची तोडण्यासाठी गेले आहेत. कोरोनाच्या फैलावा नंतर देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे कंधार तालुक्यासह लोहा व मुखेड तालुक्यातील मिरचीतोड मजूर तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यात अडकून पडले. या सर्व मजुरांची तेथे सोय व्हावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी प्रयत्न चालवले.

या प्रयत्नामुळे सुरवातीला तेलंगणा प्रशासनाने अडकलेल्या मजुरांना तुटपुंजे अन्नधान्य वाटप केले. मात्र, उपलब्ध धान्यातून त्यांची पोटाची खळगी भरत नव्हती. सद्याच्या घडीला तेलंगणा सरकारकडून या मजुरांना कोणत्याच प्रकारची जेवण्याची, राहण्याची, किंवा आरोग्याची सुविधा पुरवली जात नाही. हे सर्व मजूर रानात पाली टाकून नैसर्गिक आपत्तींना तोंड देत कसेबसे जीवन कंठीत आहेत. या मुळे मिरचीतोड कामगार अस्वस्थ झालेला आहे. या मजुरांची गावाकडे थोडीफार शेतजमीन असून ते तेलंगणामध्ये अडकून पडल्याने त्यांच्या शेतीचे मशागतीचे कामही रखडून पडले आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये हे मिरचीतोड कामगार शेतात वास्तव्यास आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची निवाऱ्याची व्यवस्था नाही. अवकाळी पावसामुळे लहान मुले आणि महिलांचे हाल होत आहेत. अशा वेळी त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय झाल्याने मिरची तोड मजूर समाधान व्यक्त करीत आहेत.

लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक आणि भाविकांना घरी पाठवण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय महत्वाचा आहे. उन्हा-तानात, पाऊस-पाण्यात परराज्यात उघड्यावर जीवन कंठीत करणाऱ्या मन्याड खोऱ्यातील मजुरांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. केंद्राच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो.
- उत्तम चव्हाण, पंचायत समिती सदस्य, कंधार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT