नांदेड : कोरोनाची महामारी सुरु झाल्यापासून महाराष्ट्र सरकारने आणि आरोग्य सचिवांपासून सर्व जिल्हयातील प्रशासकीय अधिका-यांनी आयएमएच्या आणि इतर सर्व खाजगी डॉक्टरांवर सतत अन्याय केला आहे. डॉक्टरांना सतत गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश कदम यांनी केला.
कोविड रुग्णालयातील बाधित रुग्णांच्या उपचाराचे दर दडपशाही पद्धतीने डॉक्टरांना विश्वासात न घेता एकतर्फी ठरविण्यात आलेले आहेत. हे दर खासगी रुग्णालयांना मुळीच परवडणारे नसल्याने ही रुग्णालये बंद पडण्याची वेळ आलेली आहे. रुग्णालयाच्या परवडणान्या दरात थोडीशी कुचराई झाल्यास ऑडिटर पाठवून डॉक्टरांवर कारवाया केल्या जात आहेत. डॉक्टर्स रुग्णांची लूट करीत आहेत, असा अपप्रचार मंत्री आणि नेते मंडळी तसेच प्रसारमाध्यमांतून होत असल्याने डॉक्टरांचे मनोधैर्य खचत चालले आहे.
रुग्णालयाच्या आयसीयुकरिता ठरवलेल्या सध्याच्या दरामध्ये ऑक्सिजन, पीपीई किट्स, बायोमेडिकल वेस्ट चार्जेस, कर्मचाऱ्यांचे पगार, निर्जंतुकीकरणाचा खर्च भागवणे रुग्णालयांना अवघड होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे २५ हजार रुग्णालयांपैकी बहुसंख्य रुग्णालये बंद पडण्याची वेळ आलेली आहे.
हे देखील वाचलेच पाहिजे - इसापूर धरण 95 टक्के भरल्याने- पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा
विशेष म्हणजे दर वाढवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. त्यात आयएमए समवेत चर्चा करून ३१ ऑगस्टपूर्वी एक बैठक घेऊन दर निश्चित करण्याचे ठरवले होते. मात्र तशी बैठक न घेता राज्याच्या आरोग्यसचिवांनी ३१ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढून हे दर कायम ठेवून त्यात पुन्हा इतर जाचक अटींची भर घातली आहे. त्यानंतर आयएमए संघटनेने ठरवलेल्या दरामध्ये फेरबदल करण्यासाठी चर्चा बोलवावी, अशी विनंती एक सप्टेंबर रोजी केली होती. मात्र, अद्यापही शासनाने त्याबाबत काहीच पावले उचललेली नाहीत.
आयएमएच्या रास्त मागण्या
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.