file photo 
नांदेड

दमरेच्या नांदेड विभागातूुन जानेवारी महिन्यात 33 किसान रेल्वे धावल्या; 6.58 कोटीचे महसुल

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करुन देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरु केली आहे. नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्सप्रेस ता. 5 जानेवारीला नगरसोल येथून सोडण्यात आली. नांदेड रेल्वे विभागातील नगरसोल येथून 31 जानेवारीपर्यंत 33 किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. या 33 किसान रेल्वे मधून 13 हजार 658 टन (तेरा हजार सहाशे अठावन्न टन )  कांदा पाठविण्यात आला.  

या किसान रेल्वे संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला आदी  ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत चालविण्यात आलेल्या 33 किसान रेल्वेमधून नांदेड रेल्वे विभागास 6. 58 कोटी (सहा कोटी अठावन्न लाख रुपये ) चा महसूल मिळाला आहे. नांदेड विभागातून या वर्षी मार्च महिन्याअखेरीस आणखी 75 किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे उद्दिष्ठ आहे. ता. दोन फेब्रुवारीपर्यंत विविध ठिकाणाकरिता आणखी 105 किसान रेल्वेची मागणी नोंदविण्यात आली आहे. 

किसान रेल्वेचे वैशिठ्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात, साधारण 50 किलोमीटर प्रती घंटा या वेगाने धावतात, यामुळे शेती माल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजार पेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने "ऑपरेशन ग्रीन्स- टॉप टू टोटल" च्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली.  त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वे ला वाहतुकीसाठी 5० टक्के दर सवलत देण्यात आली आहे. 

विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी नगरसोल स्थानकातुन यशस्वीपणे किसान रेल सुरु करण्याकरिता केलेल्या प्रयत्नाबद्दल आनंद व्यक्त केला.  श्री सिंघ यांनी शेतकरी आणि व्यापारी यांना आवाहन केले आहे की, किसान विशेष रेल्वेकरिता अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरुन आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा. तसेच नांदेड विभागातून मालवाहतूक वाढवण्यात  हातभार लावावा.  

किसान रेल्वे व्यतरिक्त नांदेड विभागाने या वर्षी माल वाहतुकीमध्ये उत्कृष्ठ प्रदर्शन करुन वसमत, औरंगाबाद आणि परभणी रेल्वे स्थानकावरुन विविध ठिकाणी 12 साखरेचे रेक पाठविले. तसेच आदिलाबाद येथून पाच मक्याचे रेक पाठविले. हिंगीली रेल्वे स्थानकावरुन तीन वर्षाच्या अंतरानंतर सरकीचे तीन रेक पाठविण्यात आले तसेच मालटेकडी- नांदेड येथून गुळाचे पाच रेक पाठविण्यात आले आहेत. 

इंजिनीरिंग विभागातील कर्मचाऱ्यांनी रेल्वे पटरीच्या देखरीखीकरिता विशेष मेहनत घेतल्यामुळे मालगाड्यांच्या गतीमध्ये खूप सुधारणा झाली आहे. नांदेड विभागातील मालगाड्यांची गती 28 किलोमीटर प्रती घंटा होती यावर्षी ती वाढून 45 किलोमीटर प्रती घंटा झाली आहे. याचा परिणाम मालवाहतूक वाढण्यावर  झाला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT