jayant patil criticize bjp leaders politics nanded esakal
नांदेड

भाजप नेत्यांनी ताळतंत्र सोडले; जयंत पाटील

मुंबईतील पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उल्लेख

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सध्या बोलण्याचे ताळतंत्र सोडले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केली. पाटील यांनी दुपारी विधानसभा मतदारसंघनिहाय पक्ष संघटनेचा तसेच सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, जिल्हा निरीक्षक आशाताई भिसे, नांदेड निरीक्षक प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उल्लेख केला आहे. त्यांना नेहमीच राष्ट्रवादी आणि या पक्षाचे नेते दिसतात. खोटे आरोप करणे आणि बेबनाव रचण्याचे काम भाजपचे नेते मंडळी करत असून त्यांनी सध्या ताळतंत्र सोडले आहे. माझ्यात आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यातही काहीच नाराजी नाही. यासंदर्भात केवळ वावड्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT