वाई बाजार (जिल्हा नांदेड) : माहूर- किनवट तालुक्यात महावितरण कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या विजेचा लपंडाव नित्याचीच डोके दुखी बनली असून कारखानदार, उच्चवर्गीयांसह सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थी देखील त्रस्त झाले आहेत. अनेक गावातून आमदार भीमराव केराम यांना तक्रारी प्राप्त होत असल्याने. फोनवर उपलब्ध न होणारे कामचुकार तसेच शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणारे करणारे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आमदारांच्या रडारवर आले आहेत.
किनवट व माहुर तालुक्याच्या ग्रामीण भागात तासन् तास वीज पुरवठा खंडित राहत आहे. काही ठिकाणी जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्यामुळे तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांचे हलगर्जीपणामुळे खेड्यापाड्यातील लोकांना रात्र अंधारात काढावी लगते. याहीपेक्षा शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा मिळत नसल्याने डबल फेस, थ्री फेस अशा स्वयंघोषित नियमामुळे शेतकऱ्यांना रात्र शेताच्या बांधावर काढावी लागत आहे. रात्री देण्यात येणारा वीजपुरवठा दिवसा दिल्यास वीज वितरण कंपनीचे नेमकं काय बिघडते हे अजून तरी कुणालाच कळले नाही. त्यातल्या त्यात दोन्ही तालुक्यात ब्रेक डाऊनच्या नावाखाली सुरळीत सुरु असलेले पावर सप्लाय अचानकपणे खंडित केले जात असल्याने तासन तास ‘वीज गुल’राहते. जणू काही ब्रेक डाऊन या गोंडस नावाखाली अघोषित लोडशेडिंग वीज ग्राहकावर लादली जात आहे.
अधिकांश गावांमधील लाईनमनचा फोन बंद असतो. तर काही गावात आपल्या गावाचा लाईनमन कोण हे अद्याप माहीत झालेले नाही. अशा परिस्थितीत ग्राहक थेट माहूर- किनवट या शहराच्या ठिकाणी बसलेल्या अभियंत्याला फोन करतात तरी देखील परिणाम शून्य असतो. अशा एक ना अनेक तक्रारी शेतकरी, कारखानदार, व्यापारी एवढेच काय तर विद्यार्थ्यांनी आमदार भीमराव केराम यांना केल्याच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवरील वीज कर्मचारी ते तालुका स्तरावरील अभियंत्यांच्या कामचुकारपनाबद्दल तिव्र नाराजी व्यक्त करत खेडेगावतील नागरिकांच्या अखंडित वीज सेवेसाठी अडथळा निर्माण करुन फोन नॉट रीचेबल करुन ठेवणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. यापुढे ग्रामीण नागरिकांच्या अशा किरकोळ कामासाठी हलगर्जीपणा होत असल्याची तक्रार आल्यास त्यांच्या कायम निलंबनासाठी मी पाठपुरावा करेन असा निर्वाणीचा इशारा किनवट विधानसभा मतदार संघाचे आ. भीमरावजी केराम यांनी दिला आहे.
माहूर किनवट आदिवासीबहुल तालुक्यात अलीकडे वीज वितरण कर्मचारी शेतकऱ्यांना देत असलेल्या उद्धट वागणुकीबद्दल महावितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी यांच्याशी सयुंक्त चर्चा करुन कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्याला विरुद्ध कारवाई करण्याची आग्रही मागणी करणार आहे.
- आमदार भीमराव केराम, किनवट.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.