file photo 
नांदेड

गाव कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, खते बी-बियाणे खरेदीमध्ये फसवणूक होऊ नये. बोगस बियाणे, खते व कीटकनाशकांची जादा दराने विक्री होऊ नये. यासाठी ग्रामीण भागातील शासनाची महत्त्वाची पदे असलेली तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य भागवत देवसरकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

गावातील कर्मचारी मुख्यालयी राहावे
कोरोनाव्हायरसने ग्रामीण भागातही आता पाय रोवायला सुरवात केली आहे. बाहेर घेऊन आलेल्या व्यक्तीमुळे ग्रामीण भागातल्या व्यक्तींना कोरोना संसर्गाची लागण होत आहे. जिल्ह्यात अशी बरीच प्रकरणे सापडली आहेत. या बाबत शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहिले तर आवश्यक ती दक्षता, काळजी घेऊन कोरोणाचं संसर्ग ग्रामीण भागात कमी होऊ शकतो. यासाठी गावातील प्रमुख शासकीय कर्मचारी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांनी मुख्यालय राहणे गरजेचे आहे. 

जिल्हा प्रशासनाने पावले उचलावी 
येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते बियाण्याची कुठलीही अडचण होणार नाही. पेरणी करता शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी कृषी सहायकांनी त्यांच्या मुख्यालयी मुक्कामी राहून मार्गदर्शन केले तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, खरीप हंगामात त्यांना पेरणीसाठी फायदा होईल. याबाबत जिल्हा प्रशासनाने तत्काळ योग्य ती पावले उचलून ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक या तिघांनाही मुख्यालय राहणे बंधनकारक करावे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढावा अशी आग्रही मागणी भागवत देवसरकर यांनी केली आहे.

कर्ज मागणीसाठी कर्मचाऱ्यांची गरज
कोरोना विषाणूमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे शेतमाल घरात पडून आहे. अशावेळी पेरणीसाठी खते बियाणे औषधे खरेदीसाठी शेतकरी बाजारात गर्दी करत आहे. या काळात शेतकऱ्यांना पिककर्जाची आवश्यकता असते. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी गाव कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT