File photo
File photo 
नांदेड

नांदेड : कापूस उत्पादक शेतकरी ऐन दिवाळीमध्ये अडचणीत

प्रमोद चौधरी

नांदेड : यंदा अवकाळी व परतीच्या पावसाने खरीप पिकांचे केलेले नुकसान, दिवसागणिक वाढत जाणारी महागाई, उत्पादनाला कवडीमोल असलेला बाजार भाव यासह इतर संकटामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता बोंड अळीमुळे जवळपास जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पांढऱ्या सोन्याची अक्षरशः नासाडी झाली असून बोंड अळीमुळे शेतकऱ्यांचे फरदडीचे स्वप्न देखील धुळीस मिळाले आहे.

कापसाच्या उत्पन्नातून उत्पादन खर्च निघणे अवघड झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत होत आहे. अचानक आलेल्या संकटामुळे कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. यंदा बोंड अळीने आक्रमण केल्याने नोव्हेंबर महिन्यात पांढऱ्या सोन्याची नासाडी झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. कापसाच्या उत्पन्नातून उत्पादन खर्च निघत नसल्याचे पाहून हतबल झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी अक्षरशः उभ्या कपाशीच्या पिकात चरण्यासाठी जनावरे सोडली आहेत. तर काही शेतकरी उभी पऱ्हाटी उपटून फेकून देत आहोत.

वास्तविक पाहता अनेक शेतकऱ्यांचा वार्षिक ताळेबंद हा सोयाबीन व कापसाच्या उत्पन्नावर अवलंबून असतो. या पिकावरच अनेक शेतकरी दिवाळीचा सण साजरा करतात. परंतु यंदा सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने सुरुवात करून देत खरीपातील मूग, उडीद, सोयाबीन पिके मातीमोल केली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची उरली सुरली मदार कापूस पिकावर होती. परंतु मागील काही दिवसांत वातावरणात बदल झाल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकावर बोंड अळीने आक्रमण केले आहे. या अळीचा सर्वाधिक फटका हा आदिवासी बहुल असलेल्या किनवट तालुक्याला बसला आहे.

फरदडीच्या कापसाचे स्वप्न अधुरेच
डिसेंबर, जानेवारीपर्यंत कापूस वेचणीचा हंगाम राहतो. त्यानंतर अनेक शेतकरी कपाशीला सिंचन करतात. त्यामुळे कपाशीला फरदडी फुटून त्यातून कापसाचे उत्पन्न होते. परंतु यंदा पडलेल्या बोंड अळीने फरदडीच्या कापसाचे स्वप्न अधुरे राहिले आहे. पुढच्या वर्षी या अळीचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी शेतकरी फरदडीची अपेक्षा न ठेवता चक्क कपशू उपटून फेकून देत आहेत.

सर्व्हे करून मदत द्यावी
यंदा तीन एकरात कपाशीची लागवड केली होती. यासाठी हजारो रुपये खर्च केले. परंतु कपाशी बोंडावर येत नाही तोच अळीने त्यावर आक्रमण केले. पाहिजे तसे कपाशीचे उत्पन्न झाले नाही. सतत्चाय पावसाने मूग, उडीद व सोयाबीन हातून गेले आहे. आता बोंड अळीने ग्रासून टाकले आहे. त्यामुळे नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत हवी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT