नांदेड - अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले.  sakal
नांदेड

नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

काही शेतकऱ्यांनी कुडाचे छप्पर काढून पक्के बांधकाम करायचे ठरवले होते.

वैभव पाटील

नायगाव : यंदा पाऊस चांगला झाल्याने सोयाबीन चांगले येईल. त्यावर मुलीचे लग्न करता येईल. काही शेतकऱ्यांनी कुडाचे छप्पर काढून पक्के बांधकाम करायचे ठरवले होते. परंतु, एका रात्रीत अतिवृष्टीमुळे मुरुडा नदी पूर आला. अन् असंख्य शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. शेतात पिकले, तेवढे मातीसह वाहून गेले. पशुधनही दगावले, आता पुन्हा संसार शुन्यापासून कसा उभा करायचा? अशी अवस्था नायगाव, पाडोळी, बोरगाव, रायगव्हाण या गावांतील नागरिकांची झाली आहे.

२७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीने परिसरातील मुख्य नद्या व उपनद्यांना पूर आला. यात पिकांचे अतोनात नुकसान झाले. याच दिवशी रात्री अचानक मुरुडा नदीला मिळणाऱ्या नदीचे पाणी तुंबले. त्यामुळे नदी काठच्या शेतजमिनीसह ऊस व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. शिवाय नायगाव, पाडोळी, बोरगाव, रायगव्हाण या गावांची पिके काही दिवस पाण्यातच होती. तर नायगावच्या मनमत बेलगुरे यांनी पाच बॅगचे काढून ठेवलेल्या सोयाबीनचा ढीग वाहून गेला.

झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी बाळगलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. आता शासनाने तातडीने सरसकट मदत करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

सलग तिसऱ्या वर्षी शेतातील सोयाबीन अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. भावाच्या दवाखान्यासाठी झालेले खर्चातून आता सावरायची वेळ होती. सोयाबीनवर देणे देऊन मुलांचे शिक्षण करायचे ठरवले होते. पण, निसर्गाने सर्व काही नेले. आता उरले- सुरले सोयाबीनचे पीक चिखलात आहे.

-कल्याण पांचाळ, नायगाव

माझ्या शेतात सोयाबीनसह जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे पीक तर गेलेच पण जमीनही नापिक झाली आहे. आता भविष्य अंधारात दिसत आहे.

-देविदास गोरे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra E-Bond: कागदी बाँडला रामराम; ई-बाँडची सुरुवात, महायुती सरकारचा मोठा निर्णय, फायदे काय?

Arattai vs WhatsApp: स्वदेशी ॲप ‘Arattai’ कोणत्या बाबतीत आहे ‘WhatsApp’पेक्षा वरचढ!

Vande Bharat Train Accident : दसरा उत्सवावरुन परतणाऱ्या पाच तरुणांना 'वंदे भारत' ची धडक, ४ जणांचा जागीच मृत्यू, १ गंभीर जखमी

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Latest Marathi News Live Update: जम्मू काश्मीर गुलमर्गमध्ये हंगामातील पहिली बर्फवृष्टी

SCROLL FOR NEXT