file photo 
नांदेड

नांदेड : किसान रेल्वेने द्राक्षांची वाहतूक; बिजनेस डेवलोपमेन्ट युनिटच्या प्रयत्नांना यश 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड रेल्वे विभागातून मालवाहतूक वाढावी म्हणून विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी बिजनेस डेवलोपमेन्ट युनिट (बी.डी.यु.) ची टीम गठीत केली आहे. या टीममध्ये चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेलीय. हे अधिकारी नांदेड रेल्वे विभागातील विविध ठिकाणी भेटी देवून मालवाहतूक वाढवण्याकरिता सतत प्रयत्न करत आहेत. 

यामध्ये वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक जी. चंद्रशेखर, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक ए.  श्रीधर, वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक उदयनाथ कोटला, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता शेख मोहम्मद अनिस यांचा समावेश आहे. तसेच मालवाहतूकदार आणि व्यावसायिकांशी सतत संपर्कात राहण्या करिता विभागीय परिचाल व्यवस्थापक डॉ. अनिरुद्ध पमार आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक व्ही. रविकांत यांची नियुक्ती केली आहे. 

गुरुवारी (ता. 11) मार्च रोजी नांदेड रेल्वे विभागातील या बी.डी.यु. टीमला मोठी उपलब्धता मिळाली. नगरसोल येथून किसान रेल्वे ने 70 टन द्राक्षे गौरमालडा, पश्चिम बंगाल येथे पाठविण्यात आली. नांदेड रेल्वे विभागातून या वर्षी ता. पाच  जानेवारी, 2021  रोजी सुरु केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला आहे. आत्तापर्यंत 88  किसान रेल्वे ने नगरसूल येथून देशाच्या विविध भागात कांदा पोहोचविला आहे. किसान रेल्वेने वाहतूक केल्यामुळे वाहतूक दरात 50 % सूट देण्यात येत आहे. अनेक शेतकरी, व्यापारी याचा लाभ घेत आहेत. 

ता. 11 मार्च रोजी नगरसोल येथून प्रथमच द्राक्षे पाठविण्यात आली. यामुळे द्राक्षे उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांनाही किसान रेल्वेचा लाभ घेत येत आहे. नांदेड रेल्वे विभागातील इतर ठिकाणाहून सुद्धा किसान रेल्वे सुरु करण्याकरिता संबधित बी.डी.यु. टीममधील अधिकारी प्रयत्नरत आहेत. मालवाहतूक भाड्यात 50% सूटचा इतर ठिकाणातील शेतकरी मित्रांनी, व्यापार्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपिंदर सिंघ यांनी केले आहे. 

कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेलचालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरु केली आहे. नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्सप्रेस ता. पाच जानेवारी, 2021 ला नगरसोल येथून सोडण्यात आली. या किसान रेल्वे संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला, फातुहा आदी  ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. 

किसान रेल्वेचे वैशिठ्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात, साधारण 50 किलोमीटर प्रती घंटा या वेगाने धावतात, यामुळे शेती माल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजार पेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना  आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने "ऑपरेशन ग्रीन्स- टॉप टू टोटल" च्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वे ला वाहतुकीसाठी 5० टक्के दर सवलत देण्यात आली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT