नांदेड : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरिपातील पेरण्यांची वेग घेतला. बुधवारपर्यंत जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ६२ टक्क्यानुसार चार लाख ७१ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. यात सर्वाधिक अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारपासून मात्र पावसाचा जोर मंदावला आहे.
जिल्ह्यात खरिप हंगामात सात लाख ६६ हजार ८०९ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे. यंदा मृग नक्षत्राच्या शेवटच्या चरणात खरिपातील पेरण्यांना प्रांरभ झाला. परंतु हा पाऊस सर्वदूर नसल्याने ठराविक भागातच पाऊस झाला होता. यानंतर मात्र पावसाने कमी - अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने सर्वत्र पेरण्यांना सुरुवात झाली.
बुधवारपर्यंत जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ६२ टक्क्यांनुसार चार लाख ७१ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. यात सर्वाधिक अडीच लाख हेक्टरवर सोयाबीन तर एक लाख ३० हजार हेक्टरवर कपाशी, ४४ हजार हेक्टरवर तूर, १५ हजार हेक्टरवर मुग, १४ हजार हेक्टरवर उडीद, दहा हजार हेक्टरवर खरिप ज्वारीची लागवड झाली आहे.
पावसाचा जोर मंदावला
जिल्ह्यात मंगळवारपासून मात्र पावसाचा जोर मंदावला आहे. मागील आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरिपातील पेरण्यांना वेग आला होता. बुधवारपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १४०.५० मिलीमीटरनुसार १७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. या काळात शेतकरी अंतरमशागतीची कामे करत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.