file photo 
नांदेड

नांदेड : दाळीचे दर गगणाला, भाजीपाल्याचे दर कडाडले, अनेक भाज्या गायब

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात मागील तीन महिण्यापासून सतत पावसाने दडी धरल्याने शेतातील मुग, उडीद हे कडधान्य हातचे गेले. तसेच रानभाज्यासुद्धा पावसाने पाहिजे अशा आल्या नाही. याचा फटका भाजीपाल्याला बसला. बाजारात दाळी महागल्याने भाजीपाला तेजीत आला आहे. कुठल्याही भाजीचा भाव विचारला तर ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. अनेक हिरव्या भाज्या बाजारातून गायब झाल्या आहेत. हिरवी मिरची ५० ते ६० रुपये, कांदा ६० रुपये, लसुन १५० रुपये या दराने विकल्या जात आहे. या महागाईचा फटका सर्वसाधारण ग्राहकांना बसला असून गृहीणींचे बजेट कोलमडले आहे. 

मागील तीन महिन्यात पावसाची सतत रिपरिप सुरू होती. परिणामी शेतात पाणी थांबल्याने भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. दरम्यान बाजारातून मेथी, चुका, पालक गायब झाला असून इतर भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांना आता भाजीपाल्याऐवजी डाळी, अंडी, चिकन यावर भर द्यावा लागत आहे. मात्र दाळीही कडाडल्याने आता खवय्यांची चांगलीच पंचायत आली आहे. जेवणात नेहमी लागणारी हिरवी मिरची ५० ते ६० रुपये किलो, कांदा ६० रुपये किलो आणि लसुन १५० रुपये किलो. सोबतच कोथिंबीर दहा रुपयाला ५० ग्रॅम दराने मिळत आहे. त्यामुळे घराघरात फोडणी महागली आहे. 

शेवगा चांगला भडकला

बाजारात आलेल्या ग्राहकांच्या तोंडाला पाणी सोडणारी सिमला मिरची, तुरई (दोडके), गवार, फुलकोबी, पानकोबी, भेंडी, कदु, भोपळा, शेपु या भाजीपाल्यांचा दर गगणाला भिडला आहे. हा भाजीपाला ६० ते ८० रुपये किलो दराप्रमाणे मिळत आहे. शेवग्याच्या शेंगा सध्या बाजारात उपलब्ध नाहीत. परंतु आहे त्या ठिकाणी त्यांचे दर १२० ते १५० रुपये किलो आहे. शेवगा शेंग सध्या बायलर चिकनपेक्षाही महागली आहे. या सोबतच आलू मात्र सध्या चाळीस रुपये किलोवर थांबला आहे.

पावसाने मेथी, पालक गेल्याने बाजारातून गायब

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास भविष्यात भाजीपाल्याचे दर पुन्हा वाढतील असे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. हिरवा भाजीपाला गायब होत असल्याने दाळीचाही भाव कडाडला आहे. मेथी, पालक हा भाजीपाला शेतातच अती पावसामुळे सडून गेला आहे. त्यामुळे बाजारात मेथी, पालक विक्रीसाठी येत नाही. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतातील भाजीपाला खराब झाला आहे. भाजीपाला कमी प्रमाणात मिळत असल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. 

अंड्याचा भाव वाढला

नेहमी ५० रुपये डझन मिळणारे अंडे आता ८४ रुपयाने मिळत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे दर वधारले असून सर्वसामान्य ग्राहकांना भाजीपाला महागला की अंड्याचा आधार वाटत होता. परंतु त्याचाही भाव वाढल्याने ग्राहक हवालदिल झाला आहे. सततच्या पावसाने सर्व बाजारावर परिणाम केला आहे. शेतकऱ्यांच्या पूर्वहंगामी पिकांसोबत भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजीपाला पीक विम्याचा अधिपत्याखाली आणावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : लासलगावमध्ये एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला...

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT