File photo
File photo 
नांदेड

कोरोना इफेक्ट : शाळा सुरु करण्याबाबत शाळांची नकार घंटा

प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढतच आहे. नववी ते बारावीच्या नियमित शाळा सुरु करण्याबाबत शाळा समिती व पालकांची भूमिका जाणून घेण्यात येत आहे. त्यामध्ये बहुतांश शाळांनी नकार घंटा दिली आहे. शिक्षण संस्थांबरोबरच पालकांमधूनही नाराजी दर्शविण्यात येत असल्याने नववी ते बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरु करण्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.

नवीन शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरु करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाच्या सुरु आहेत. परंतु, प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याबाबत शैक्षणिक संस्था आणि पालक यांच्या पातळीवर हा निर्णय होईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्था, शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांची सभा घेऊन शाळा सुरु करण्याबाबतची माहिती शिक्षण विभागाकडून मागविण्यात आली आहे. मात्र, नववी ते बारावीच्या बहुतांश शाळा सुरु करण्याबाबत नकार दर्शविला आहे.

शाळा सुरु करण्याबाबत संस्थाचालक, पालक तसेच काही शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेतली असता, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी नियमित शाळा सुरू करण्यावर नाराजीच व्यक्त केलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही अडचणीत सापडला आहे. जुलै महिन्यापासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेची उत्सुकता लागली होती. शासनाकडून सुद्धा शाळा सुरु करण्याबाबत लेखी स्वरुपात कुठलेच आदेश मिळालेले नाहीत. मात्र, आता शिक्षण संस्थांनी आडकाठी घातल्याने जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरु होण्याबाबत स्पष्टता दिसून येत नाही.

वाहतुकीचा प्रश्न
बहुतांश खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे स्वतःच्या बसेस आहेत. परंतु, फिजिकल डिस्टन्सिंगमुळे वाहतुक परवडणारी नाही. तसेच काही शिक्षण संस्थांकडे स्वतःच्या स्कूल बसेसही नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात विद्यार्थी आणण्यासाठी वाहतुकीचाही प्रश्न शिक्षण संस्थांसह पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थी संख्या कमी असल्याने स्पेशल बसही त्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केल्या जाऊ शकत नाही.

काय आहे पालकांची भूमिका
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे प्रत्येकजण काळजीमध्ये असून, स्वतःसोबतच कुटुंबाची सुरक्षा कशी करावी? या विवंचनेमध्ये मध्ये. असे असले तरी, प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ग्वाही घेणार असेल तर पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. मात्र, विद्यार्थी एकत्र आल्यास धोका वाढू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT