File Photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातून दोनशे बसेसचे नियोजन, पहिल्याच दिवशी पावसाचा अडथळा

शिवचरण वावळे

 

नांदेड : राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी (ता.१९) राज्यांतर्गत बससेवा सुरु करण्याची घोषणा केली. त्यानुसार नांदेड विभागातून २०० बसचे नियोजन करण्यात आले होते. परंतू गुरुवारी (ता.२०) सकाळी दहा वाजेपर्यंत केवळ ४५ बसेस धावू शकल्या अशी माहिती वरिष्ठ विभागीय अधिकारी अविनाश कचरे यांनी दिली.

यापूर्वी समांतर अंतर राखत जिल्ह्यांतर्गत दिवसाला ७७ बस धावत होत्या. परंतू अनेक ठिकाणच्या बसस्थानकात पुरेशी प्रवाशी संख्या नसल्याने महामंडळाच्या बसला चांगलाच घाटा सहन करावा लागत होता. परंतु गुरुवारापासून सुरु करण्यात आलेल्या राज्यांतर्गत बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पहिल्याच दिवशी नांदेड विभागातील नांदेड, भोकर, मुखेड, देगलूर, कंधार, हदगाव, बिलोली आणि माहूर या आगारातून बस सोडण्यात आल्या आहेत. मात्र किनवट आणि माहूर तालुक्यातून जाणाऱ्या रस्त्यावरील पूल तुटल्याने दोन्ही आगारातून बस धावू शकल्या नाही. माहूर - किनवट मार्गाला पर्यायी रस्ता म्हणून महामंडळाच्या काही बसेस ह्या टेभूर्णी मार्गे सोडण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- राज्यातील २३६ महिला चालकांना कामावर परतण्याची आस ​

बसची चाके थांबल्याने प्रवाशांनाच नव्हे तर, चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांना  फटका

रोज लाखो रुपयाचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या बसची चाके थांबल्याने केवळ प्रवाशांनाच नव्हे तर, चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांना देखील त्याता फटका सहन करावा लागला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते चतुर्थ कर्मचाऱ्यांचे पगार करण्याइतके पैसे देखील महामंडळाच्या तिजोरीत शिल्लक राहिले नाहीत.

हेही वाचा- नांदेडमधील एका लग्नाची अशीही गोष्ट, आरोप- प्रत्यारोपाने गाजली


जिल्ह्यातील या आगारातून इथे सोडण्यात आल्या बसेस

नांदेडहून- बीड, सोलापूर, सातारा, नागपूर
भोकर- नगर, अक्कलकोट, लातूर
मुखेड- पुणे, सोलापूर, सिंगणापूर, अमरावती
देगलूर- औरंगाबाद
कंधार- नागपूर (दोन बस)
हदगाव- आकोला, औरंगाबाद
बिलोली- रिसोड, औरंगाबाद, आमरावती
माहूर- टेभूर्णी मार्गे परळी आणि आमरावती या मार्गावर सकाळी दहा वाजेपर्यंत ४५ बसेस सोडण्यात आल्या आहेत.


शुक्रवारी ३०० बस सोडण्यात येतील
प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळतो यावर बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी २०० बसचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु पावसामुळे अनेक मार्गावर बस धावू शकल्या नाहीत. शुक्रवारी ३०० पर्यंत बस फेऱ्या वाढवण्यास उत्सुक असलो तरी, सर्व काही पावसावर अवलंबून असेल.
-अविनाश कचरे (वरिष्ठ विभागीय अधिकारी)

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: पानिपतकार विश्वास पाटील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

Kamshet News : कामशेतमध्ये महामार्गालगत कचऱ्याचे ढीग,दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; व्यवस्थापनाअभावी गंभीर परिस्थिती

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सरकारमध्येच जुगलबंदी: भुजबळ-विखे पाटलांमध्ये मतभेद

Sangli Crime News : राजकीय स्वीय सहायकाचा त्रास, पंचायत समितीतील २७ वर्षीय अभियंत्याचा मृत्यू; कृष्णा नदीत मृतदेह सापडल्याने आरोप...

PCMC News : नवनगर विकास प्राधिकरणाच्या जमिनी द्या, पीएमआरडीएची मागणी; अतिक्रमणबाधितसह मोकळ्या जागा हव्यात

SCROLL FOR NEXT