Nanded News 
नांदेड

शाळा सुरु झाल्या, पण...अभ्यासक्रमाचे काय? डॉ. गोविंद नांदेडे 

प्रमोद चौधरी

नांदेड : आठ महिण्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात दोन डिसेंबर रोजी शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा स्थापन झाल्यापासून आजपर्यंतच्या इतिहासात एवढा प्रदीर्घकाळ शाळा कधीच बंद नव्हत्या. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर काही दिवस बालकांची हुरहूर त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येणार आहे. शिक्षकांनाही अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा ताण असणार आहे. त्यामुळे नियोजन केल्यास अभ्यासक्रम पूर्ण होवू शकतो, असे मत माजी शिक्षण संचालक (पुणे) डॉ. गोविंद नांदेडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापना सुरु झाल्या. दोन डिसेंबरपासून आता शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थी पालकांच्या संमतीने शाळेत जायला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता पूर्वपदावर आल्यासारखा वाटत आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी शारीरिक अंतर ठेऊन बसत असल्यामुळे तशी कोरोना प्रादुर्भावाची भिती कमी झाली आहे. शिवाय सम विषम दिनांक म्हणजे एक दिवसाआड विद्यार्थी शाळेत येतील या निर्णयामुळे शाळेत गर्दी नसणार. दररोज फक्त गणित, इंग्रजी आणि विज्ञान यासारखेच विषयाचे प्रत्यक्ष अध्यापन होणार आहे. 

दररोज केवळ तीन ते चार तास अध्यापन असेल. त्यामुळे विद्यार्त्यांना आनंदाने अध्ययन करण्याचा आनंद मिळणार आहे. या शासन निर्णयामुळे खरे मन मोकळे शिक्षण घ्यायची संधी मुलांना मिळणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसणार असल्याने त्यांना मोकळा श्वास घेता येणार आहे. एका वर्गात शंभर शंबर विद्यार्थी कोंबले जायचे त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देता येत नव्हते. आता अध्यापनातील प्रत्येक आशय विद्यर्थी नीट समजून घेऊ शकतील. 

आता माध्यमिक शिक्षकांनी येत्या पाच महिन्यात निर्धारीत अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. वर्गात त्यांनी आता स्वयंअध्ययन आणि स्वाध्याय पद्धतीचा हुकुमी वापर करावा. वर्गातील पाच पाच विद्यार्थ्यांचे गट करून अध्ययन घटकांतील एकेक आशय खंड अध्ययनासाठी द्यावा आणि त्यांनीच वर्गपीठावर येऊन इतर विद्यार्थ्यांना सहभागी करून चर्चा पद्धतीने अध्ययन करण्याची संधी द्यावी. अशा शिक्षणातून मुले सक्षम, विचारवंत आणि ज्ञान स्वावलंबी होतात. शिक्षक फक्त वर्गातील स्वयंअध्ययन प्रक्रियेला योग्य दिशा देण्याचे व काही ज्ञानांशाबाबत करमीत कमी हस्तक्षेपाचे धोरण अवलंबतील. वर्गात कमी विद्यार्थी असल्यामुळे ही स्वयंअध्ययन पद्धती फलदायी होऊन विद्यार्थी परिपूर्ण बनतील व अभ्यासक्रम शंभर टक्के पूर्ण करण्यास आणि शिक्षणातून आनंद घेण्यास सक्षम ठरतील.

इंग्लंड, अमेरिकेत प्रत्येक वर्गात वीस ते पंचवीस विद्यार्थी असतात. त्यामुळे तेथील विद्यार्थी तर्क, आकलन, अनुमानाच्या उच्च दर्जापर्यंत पोचतात आणि अध्ययन अध्यापनात प्रत्यक्ष सहभागी होतात. त्यालाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण म्हणतात.
- डॉ. गोविंद नांदेडे, माजी शिक्षण संचालक (पुणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : मालेगाव महापालिकेत राजकीय भूकंप; इस्लाम पक्ष सर्वात मोठा, भाजप-काँग्रेसला जोरदार धक्का

माहेरवाशि‍णींना सासरचा हळवा निरोप! पारायण सोहळ्यात ओटी भरुन लेकींचा होणार सन्मान, पत्रात नेमकं काय लिहिलंय?

Ind vs Nz : भल्या पहाटे विराट पोहोचला उज्जैन मंदिरात; मैदानावर उतरण्यापूर्वी घेतला महाकालचा आशीर्वाद! भस्म आरतीचा video viral

Solapur Tourism: मुलं घरात राहून कंटाळीत? संडेला सोलापुरातील गड्डा यात्राला नक्की भेट द्या!

Jalna News : धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोऱ्हाडे नजर कैदीत! निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT