nanded news 
नांदेड

Video - शाळा सुरु झाल्याच तर, घ्यावी लागणार खबरदारी

प्रमोद चौधरी

नांदेड : कुठलाही देश, राष्ट्र शाळेतून घडत असतो. गत दोन-तीन महिन्यांपासून आपण कोरोनाच्या दहशतीचा अनुभव घेत आहोत. शाळा बंद, सर्व जीवनव्यवहार बंद पडलेले आहेत. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडला आहे की, शाळा कधी सुरु होणार? सुरु झाल्यावर स्थिती कशी असेल?

लॉकडाउनमध्ये शिथिलता देवून व्यवहार सुरु झाले असले तरी, जोपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत तोपर्यंत समाजव्यवहार, जीवनाला सुरुवात झाल्यासारखं वाटणार नाही. कारणही तसेच आहे. आपण सर्व व्यवहार सुरु केले तरी, शाळा बंद असतील तर सर्व समाजाला वाटणार की समाज व्यवहार अजूनही बंदच आहेत. शाळा ही समाजाचा आरसा असते. शाळा सुरु झाल्या की, समाज सुरु झाल्यासारखं वाटतं. आजची स्थिती पाहता किमान दोन-तीन महिने तरी शासन शाळा सुरु करण्याचा विचार करणार नाही. शाळा सुरु झाल्याच तर जोपर्यंत पालक, विद्यार्थ्यांच्या मनातून कोरोनाची भीती जात नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत येऊच शकणार नाही.

हेही वाचा - मुंबईहून आलेल्या दोन प्रवाशांचे अहवाल पॉझिटिव्ह 

शाळा प्रारंभानंतरची परिस्थिती कशी असेल?
कोरोना विषाणुमुळे शिक्षकांसोबतच विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे. असेच वातावरण समाजामध्ये, शाळेमध्ये देखील राहणारच आहे. कारण शाळेमध्ये उद्याचं राष्ट्र मोठं होत असतं. शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये शाळा सुरु झाल्यानंतर उद्याचा देश, राष्ट्र वाढत असतो. त्यामुळे ही अतिशय संवेदनशील बाब आहे. जागा आहे. म्हणूनच विचारलं जात की, शाळा प्रारंभानंतर काय होणार. समाजामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव संपला तरी, किमान एक वर्षभर तरी काळजी घ्यावीच लागणार आहे. पण एक ते तीन महिने शाळा प्रारंभाला वेळ लागला तरी त्यानंतर काय होईल? असा प्रश्न असणारच आहे.

हे देखील वाचाच - ‘या’ माफियांवर आली सक्रांत, महसुल पथकाने ४० तराफे जाळले ​

अशी घ्यावी लागणार खबरदारी
शाळा सुरु झाल्यावर शारीरिक अंतरासोबतच स्वच्छतेचा प्रश्‍न शाळा क्षेत्रामध्ये प्रश्न भेडसावणार आहे. म्हणून वेगवेगळ्या अॅंगलने विचार सुरु आहे. एक दिवसाआड शाळा केल्या तर सम-विषम दिवशी विद्यार्थ्यांना बोलावता येईल. त्यामुळे फिजिकल डिस्टिन्सिंगनुसार विद्यार्थ्यांना बसविणे शक्य होईल. विद्यार्थ्यांना एक दिवस सुटी मिळेल. त्यांच्या मनावरील ताणही कमी होईल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुटीच्या दिवशी अभ्यास दिला तर स्वयंअध्ययनाची सवय विद्यार्थ्यांना लागेल. शाळेतील स्वच्छतागृह, हात धुण्याची व्यवस्थेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि गावकऱ्यांनी धडे द्यावेच लागणार आहेत. असे केले तर शाळेचे वातावरण सुधारण्यास वेळ लागणार नाही.

 

विद्यार्थ्यांमधील भीती दूर करण्यासाठी शिक्षकांनी स्वतः अभ्यास करून गावकरी, विद्यार्थी, पालकांचे प्रबोधन करायला पाहिजे. शिक्षण आणि शाळा हा राष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक विचारवंताने उद्याची संपन्न, ज्ञानसंपन्न, चारित्र्यसंपन्न आणि उत्तम पिढ्यांचे निर्मिती करावयाची असेल तर विद्यार्थ्यांना पुन्हा रचनावादाची चांगली ओळख करून द्यायला पाहिजे.
- डॉ. गोविंद नांदेडे, माजी शिक्षण संचालक (पुणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: पोटासाठी कारखान्यात मजुरी अन् स्वप्नासाठी फुटबॉल... दुहेरी लढाई लढणारा पोरगाच ठरला जर्मनीचा 'तारणहार'

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT