file photo 
नांदेड

उमरी तालुक्यात सोयाबीनसह कापसाची वाट लागली, शेतकरी हतबल

प्रल्हाद हिवराळे

उमरी (जिल्हा नांदेड)  : उमरी तालुक्यात परतीच्या पावसाने सतत हजेरी लावल्याने हाती आलेले पिकांचे अतोनाथ नुकसान झाले असुन सोयाबीन, कापुस, हळद व अन्य पिकांची तर वाट लागली आहे. पेरणी खत- बि बियानाचा खर्च तरी निघेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू वाहताना दिसुन येत आहे.

उमरी तालुक्यात कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, ज्वारी, हळद या पिकांवर शेतकरी अधिक भर देतात. पेरणीच्या सुरुवातीला पिका योग्य पाऊस पडला. शेतकऱ्यालाही वाटले यंदा सुगी चांगली पिकेल. पण  झाले उलटे. निसर्ग कोपला आणी पावसाची अतिवृष्टी सुरु झाली.  पिके हिरवी असलेले पिवळे पडू लागली. कापसाचे पानेही लाल होत गेली. अनेक फवारणीवर खर्च झाला पण कोणत्याच पिकांवर फरक पडला नाही.

नशीबाला दोष शेतकरी देत राहीला

गतवर्षीचा दुष्काळ, बॅंक कर्ज, सावकाराचे कर्ज , यात मुलीचे लग्न, कुंटुबाची परिस्थिती, मुलाचे शिक्षण, कोरोना महामारी ,लॉकडाऊनचा दणका अशा अनेक समस्याना शेतकरी ग्रासला असून जगावे तरी कसे ? असे चित्र शेतकऱ्यासमोर उभे राहीले आहे. डोळे पाणाऊन आले तरीही हुंदके देत स्वतःला सावरत नशीबाला दोष शेतकरी देत राहीला. कसे बसे अर्ध पिक वाया गेले तरीही अर्ध तरी पदरात पडेल असे शेतक-याला वाटू लागले.  मात्र पावसाने तर  काय पिछ्या सोडलाच नाही. म्हणून मुग, उडीदाच्या शेंगा कोमेजून गेल्या, बुरसा चढला, सडून गेले. दाळीपुरते सुद्धा पिकले नाही. सोयाबीन हाती आले होते पण परतीच्या सततच्या पावसाने शेतात वाया गेली.

सोयाबीनपाठोपाठ कापूसही गेला

२५ % टक्केच पदरी पडले तर अनेकानी शेतात सोयाबीनचे ढग लावून ठेवले ते ही ओल्या अवस्थेत आहेत. पांढरी बुरशी चढून कोमेजुन जात आहेत . ज्वारी पावसाच्या माराने काळी काजळी धरली आहे. कापूस हे पांढरे सोने आता पिवळे पडले आहे. कापसाचे बोंडे किडकी झाले आहेत. बोंडे गळून पडत आहेत. हाती आलेल्या कुठे तरी फुटलेला कापूस पाऊसामुळे वेचता येईना. एवढे संकट शेतकऱ्याच्या  पदरी पडले. आता शेतक-यांना स्वतांचे घर संसार चालवणे कठीन होत आहे. म्हणून शेतकरी ७ / १२ गहाण ठेवून बँकेत कर्ज घेण्यासाठी बॅंकेचा उबंरवठा जिझवत दिवसराञ रांगेत बसुन राहूण हातात पैसे केंव्हा पडतीलल अशा बाळगत आहे.

पिक कर्ज देवुन दिलासा द्यावा
 
प्रत्येक बँकेत दलालाचा सुळसुळाट आहे. चेरीमेरी दिले तर तेव्हा कुठे फाईल पुढे सरकते. पिक कर्जाचे कामे दलालामार्फत हप्त्याच कामे होतात. शेतकरी थेट बँकेत गेले तर त्याना कोणी व्यवस्थीत बोलत नाही. त्यांची कर्ज फाईल तीन ते चार महिने धुळखात राहते. शेतकरी बॅंकेत चकरा मारून परेशान होतो. यावर अंकुश कोणाचेही राहीले नाही. सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधीचे शेतक-याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष दिसते. प्रशासन सुस्त आहे. शेतक-यांचा धनी कोणी उरला नाही. शेतक-यांच्या काही शेतात पिकल नाही. शेतक-यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर घेवुन शेतकरी फिरतो. घरात लग्नाला आलेली मुलगी घरातच आहे. मग शेतकरी आत्महत्या करणार नाही तर मग काय करेल. शेतकरी आत्महत्या करू नये असे सांगणारे तरी शेतकऱ्याच्या व्यथा समजून घ्यावे. पिक कर्ज देवुन दिलासा द्यावे सरकार तरी पिकाची नुकसान भरपाई आर्थिक मदत तातडीने द्यावे. पिक विम्मा शेतक ऱ्याना मिळून द्यावे अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk’s Tesla: टेस्लाची गाडी आता मुंबईत धावणार; BKC मध्ये पहिलं शोरूम उघडणार, किती आहे किंमत?

Pune: गॅस खरेदी करताय? सावधान! 2 ते 3 किलो गॅसची होतेय चोरी; तरुणांच्या सतर्कतेमुळे काळाबाजार उघड, पुण्यात काय घडलं?

Medical College: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन! 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; आमदार जगतापांनी घेतली भेट

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

SCROLL FOR NEXT