file photo 
नांदेड

Video - पर्यावरण संतुलनासाठी संवेदनशील होण्याची गरज, कशी? ते वाचाच

प्रमोद चौधरी

नांदेड : देश, राज्ये पर्याययाने शहरे हिरवीगार होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या थीम्स घेतल्या जातात. यंदा ‘टाईम फॉर नेचर’ ही थीम घेतली असून, यामध्ये प्रत्येकाने सहभागी होवून पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे मत उपवनसंरक्षक आशीष ठाकरे यांनी ‘ई-सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

प्रत्येकवर्षी पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून प्रत्येक राज्यात, शहरांमध्ये विविध उपक्रमांनी साजरा होतो. वस्तविक पाहता १९७२-७३ पासून हा दिन साजरा केला जात आहे. जलचर प्राणी, पशु-पक्षांसह मानवाला जगण्यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टींची आवश्‍यकता असते. त्या म्हणजे जल, जेवण आणि वायू. या तीनही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. मात्र, आपण हेच विसरून जात असल्याने पर्यावरणाला पर्यायाने आपल्याला विविध संकटांना दरवेळी सामोरे जावे लागत आहे.

सध्या कोरोनाचे संकट देशावर आहे. परंतु, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने एक झाल लावण्याची गरज आहे. झाड लावण्यापेक्षा त्याला जगवणे, त्याचे संगोपन करणे महत्त्वाचे आहे. असे केले तरच पर्यावरणाची वृद्धी होवून आपले जगणे सुसह्य होणार आहे. असे केले नाहीतर दरवर्षी नवनव्या संकटांना सामोरे जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नसणार.

वृक्षतोडीचा होतोय परिणाम
वृक्षतोड, वाढते प्रदूषण आणि त्यातून होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे आज पर्यावरण धोक्यात आले आहे. त्याचे परिणाम मानवांसोबतच वन्य, जलचर प्राण्यांनाही भोगावे लागत आहे. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी जंगले तोडून सिमेंटची जंगले उभारली आहेत. कापडी ऐवजी प्लॅस्टिक पिशव्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे पर्यावरणीय बदलाची तीव्रता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस ती अधिक तीव्र होत चालली आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आज जागपतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून सर्वांनी सामाजिक वनिकरणाची चळवळ राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल
आज जग विकास आणि प्रगती साध्य करताना आपण काय गमावले याचा विचार करण्याची गरज आहे. दळणवळणासाठी विकासाच्या नावाखाली रस्त्यालगतच्या झाडांची मोठ्याप्रमाणावर कत्तल झाली. होत आहे.  मानवाने निवाऱ्यासाठी झाडे तोडून सिमेंटची घरे बांधली. आजही झाडे तोडण्याचा सपाटा सुरूच आहे. एकंदरीतच अक्षम्य जंगलतोड ही आज चिंतेची बाब बनली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलातील सजिवांचे अस्तित्व अत्यावश्यक आहे.  

येथे क्लि कराच - सावधान...कोरोना येऊ शकतो तुमच्या घरात!

वृक्षतोड थांबवावी
येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त वन संरक्षण, पाण्याचा साठा तयार करणे आवश्यक आहे. तसेच अस्तित्वात असलेले पाण्याचे साठे शुद्ध स्वरूपात टिकवून ठेवणे. प्लॅस्टिकसारख्या अविघटनशील घटकाचा वापर टाळणेही गरजेचे आहे. अन्यथा आपण कितीही प्रयत्न केले तरीही पर्यावरणाचे संतुलन राखणे अशक्य आहे. यासाठी प्रत्येकाला वृक्षतोड थांबवून कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागेल. शिवाय प्लॅस्टिकमुक्त जीवनही जगावे लागणार आहे.

टाईम फॉर नेचर
यंदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘टाईम फॉर नेचर’ ही थीम आहे. यामध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन एक झाड लावावे. त्याला जगवावे. एकंदरीतच प्रत्येकाने पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील बनले पाहिजे.
- आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक (नांदेड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT