file photo 
नांदेड

बिलोली तहसीलमध्ये गाव तर मतदान धर्माबाद तालुक्यात; २५ वर्षापासून काराळचे भिजत घोंगडे 

विठ्ठल चंदनकर

बिलोली (जिल्हा नांदेड ) : तालुक्याचे विभाजन होऊन पंचवीस वर्षाचा कालावधी संपला मात्र ग्रामपंचायतीचे विभाजन अद्याप न झाल्यामुळे बिलोली तालुक्यातील काराळ येथील जनतेला कामकाजासाठी बिलोली तालुक्यात तहसील व पंचायत समितीला यावे लागते. ग्रामपंचायतीचे मतदान मात्र धर्माबाद तालुक्यातील मोकली गट ग्रामपंचायतीला जोडलेले असल्याने ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली तरी येथील सदस्यांना गावातील समस्या मांडण्यासाठी कुठेच थारा मिळत नाही. याकडे जिल्हाधिकार्‍यांनी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष वेधून काराळ वासियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पुढे येत आहे.

बिलोली तालुक्याचे विभाजन झाल्यानंतर धर्माबाद व नायगाव हे दोन तालुके अस्तित्वात आले. धर्माबाद तालुक्यात गावांची संख्या कमी पडत असल्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेले पाटोदा थडी, माष्टी, शेळगाव, मोकली इळेगाव, बामणी मनूर आणि संगम ही आठ गावे बिलोली तालुक्यातून वगळून धर्माबाद तालुक्याला जोडली गेली. या आठ गावापैकी सात ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायती असून मोकली व काराळ ही गटग्रामपंचायत आहे. या दोन गावांपैकी मोकली हे धर्माबाद तालुक्यात तर काराळ बिलोली तहसील कार्यालयात समाविष्ट करण्यात आले. 

बिलोली तालुक्याचे विभाजन होऊन पंचवीस वर्षाचा कालावधी संपला मात्र मोकली व काराळ या गट ग्रामपंचायतीचे विभाजन अद्याप न झाल्यामुळे या गावातील विकासासंबंधी नागरिकांनी दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा टाकला आहेत. काही नागरिकांनी ग्रामपंचायत विभाजनाचा प्रश्न जिल्हाधिकारी व आयुक्त कार्यालयापर्यंत तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत लावून धरला होता. २०१४ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर या गट ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले होते. या घटनेला सहा वर्षाचा कालावधी ही संपला परंतु ग्रामपंचायत विभाजनाचा मार्ग अद्याप मोकळा झाला नाही.

गेल्या दहा वर्षात नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश आले असून तीन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोकली ग्रामस्थांनी धर्माबाद तालुक्यात तर काराळ ग्रामस्थांना तालुक्यातील आरळी जिल्हा परिषद गटात मतदान करण्याची संधी मिळाली होती. आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या विभाजनाअभावी काराळ येथील मतदारांना मोकली गट निवडणुकीसाठी धर्माबाद तालुक्यात मतदान करावे लागत आहे.

मागील पाच वर्षाच्या काळात काराळ हे गाव बिलोली तालुक्यातील हज्जापूर ग्रामपंचायतीला जोडण्यात आले होते. या दोन्ही गावातील लोकसंख्या एकत्र करुन केंद्र व राज्य शासनाकडून विकास निधी प्राप्त झाला. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून पाच लाखाचे तर १४ व्या वित्त आयोगातून चार लाखाची कामे हज्जापूर ग्रामपंचायतीसाठी आलेल्या निधीतून काराळ गावात करण्यात आली.

बिनविरोध सदस्य होऊनही महत्त्व शून्य. प्रशासकीय पातळीवर या गट ग्रामपंचायतीचे विभाजन रखडले आहे. मोकली काराळ गट ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काराळ येथील दोन जागांसाठी महेमुददा रोशनसाब सय्यद व रमेश मोहन श्रीगिरे यांना बिनविरोध निवडून देण्यात आले. ही निवड पुढील पाच वर्षासाठी आहे. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचे गाव  बिलोली तालुक्यात समाविष्ट असल्यामुळे या गावचा विकास निधी बिलोली पंचायत समितीला येतो. त्यामुळे बिनविरोध निवड झालेले दोन्ही सदस्य मोकली व काराळ या गट ग्रामपंचायतीचे असणार आहेत. या सदस्यांना बिलोली तालुक्यात गावातील समस्या मांडण्यासाठी व्यासपीठचं नाही. त्यामुळे त्यांची ही बिनविरोध निवड शून्य मानल्या जाणार आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT