File Photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील ६२ केंद्रांवर रविवारी ‘नीट’ची परीक्षा, दोन परीक्षा केंद्रात बदल, जेईई मेन्सच्या गोंधळाची पुनरावृत्ती टळणार का? 

शिवचरण वावळे

नांदेड - जेईई मेन्स परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी वाहनांअभावी चांगलीच कसरत करावी लागली होती. ऐनवेळी नीट परीक्षेच्या दोन केंद्रांत बदल करण्यात आल्याने रविवारी (ता.१३) होणाऱ्या नीट परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात रविवारी एकूण ६२ परीक्षा केंद्रांवर राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (यूजी) नीटची परीक्षा होणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने १५ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, ऐनवेळी शहरातील सोमेश कॉलनी येथील नेहरू इंग्लिश स्कूल व बाबासाहेब देशमुख गोरठेकर आर्ट, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय या दोन परीक्षा केंद्रांत बदल केल्याने पालकांमध्ये आतापासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रात बदल झाला आहे अशा विद्यार्थ्यांना यूजीकडून एसएमएस व मेलद्वारे माहिती कळविण्यात आली असून, अशा विद्यार्थ्यांना वेबसाईटवरून नवीन ॲडमिट कार्ड डाउनलोड करणे आवश्‍यक आहे. 

करिअर मार्गदर्शक केंद्रांच्या नावाखाली देखावा 

विशेष म्हणजे नीट परीक्षेची सर्व अधिकृत माहिती औरंगाबाद येथून दिली जात असल्याने नीट परीक्षेला किती विद्यार्थी बसले आहेत, याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. शहरातील काही करिअर मार्गदर्शक केंद्रांच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा देखावा केला जात असला तरी, त्यांच्याकडे देखील नीट परीक्षेबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रविवारी होणाऱ्या परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी व पालकांची धावपळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

यंदा १७२ परीक्षा केंद्रात वाढ 

नेहरू इंग्लिश स्कूल (सोमेश कॉलनी) या सेंटरऐवजी केंद्रीय विद्यालय (विमानतळ रोड, नांदेड) व बाबासाहेब देशमुख गोरठेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमरी या परीक्षा केंद्राऐवजी प्रभावतीनगर परभणी येथील अरबिंदो अक्षर ज्योती असे परीक्षा केंद्र निश्‍चित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी देशभरातील ४४३ परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा नीटच्या परीक्षा केंद्रात १७२ अशी वाढ करण्यात आली आहे. 

आयआयबी विद्यार्थी- पालकांची राहण्याची सुविधा

 परीक्षेला आलेल्या परजिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांची गैरसोय होणार नाही. यासाठी आयआयबी मार्फत राहण्याची व जेवण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यापूर्वी परजिल्ह्यातील परिक्षार्थीने फोन करुन त्याची पूर्व कल्पना द्यावी लागणार आहे. एका विद्यार्थ्यांसोबत एकाच व्यक्तीने यावे असे आवाहन देखील आयाआयबीकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi cabinet: मोदींनी सर्वांनाच मागे टाकलं! मंत्रिमंडळ बैठकीत तपासलं मंत्र्यांचं डिजिटल रिपोर्ट कार्ड; 'सोशल मीडिया'वर विशेष लक्ष

आता सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार! ‘या’ वेबसाईटवर करावा लागणार अर्ज; ५० हजारांपेक्षा कमी रकमेसाठी लागणार नाही ‘एफआयआर’, वाचा...

Pune Crime : पोलिस उपनिरीक्षकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; पत्नीचा गळा दाबला, गर्भपात करायला भाग पाडले

Pimpalwandi Crime : पिंपळवंडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून; पोलिसांकडून नराधमाला अटक, आरोपीला १३ दिवसांची पोलिस कोठडी

ENG vs PAK, Test: इंग्लंडने खेळाडूंना अचानक काऊंटी क्रिकेट खेळायला पाठवले, पाकिस्तानविरुद्ध कसोटी सुरू असताना हे का केले?

SCROLL FOR NEXT