file photo
file photo 
नांदेड

अर्धापूर पाणी पाणीपुरवठा योजनेच्या कामाने घेतली गती- अशोक चव्हाण यांचे लक्ष

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : शहरातील नागरीकांची तहान भगवनारी बहुचर्चित पाणी पुरवठा योजनेच्या कामाने गती घेतली आहे. या योजनेवर सुमारे 28 कोटीच्यावर खर्च अपेक्षित असून येत्या उन्हात अर्धापूरकरांना फिल्टरचे पाणी मिळणार आहे.ही योजना सात दिवस 24 तास चालनार असून शहरातील तीस हजाराच्यावर नागरिकांची तहान भागणार आहे. ही योजना तातडीने कार्यान्वित व्हावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यासाठी आग्रही असून त्यांचे या योजनेच्या कामावर विशेष लक्ष आहे.

अर्धापूर शहर हे तालूक्याचे ठिकाण असून शहराचा झपाट्याने विस्तार व विकास होत आहे.शहरातील पाणी टंचाई दुर व्हावी यासाठी मोठ्या पाणी पुरवठा योजनेची मागणी होती. शहरातील जुन्या पाणी पुरवठा योजनेला 40 वर्ष पुर्ण झाले आहेत. या पाणी पुरवठा योजनेचा फायदा शहरातील काही भागत मिळत नाही. प्रत्येक निवडणुकीत पाणी पुरवठा योजना विषयी आश्वासन मिळत आसे. शहरातील पाझर तलावातील नगरपंचायत व लोकसहभागातून काढण्यात आला होता. याचा फायदा काही भागात झाला.पण पाणी टंचाई काही दुर झाली नाही. शहरातील नागरिकांची सारी भिस्त हातपंप व बोअरवेलवर आहे.

शहरातील नागरीकांनी पाणी पुरवठा योजनेसाठी सतत मागणी केली. तसेच काॅग्रेसचे स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने ही मागणी मान्य करून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली.

अशी आहे योजना

अर्धापूर शहराची येत्या तीस वर्षाची लोकसंख्या गृहीतधरून योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेवर सुमारे 28 कोटीच्याधर खर्च आपेक्षित आहे. या योजनेसाठी उर्ध्वपेनगंगा प्रकल्पाचे पाणी निमगाव येथिल तलावात साठवून जलवाहीनिव्दारे अर्धापूर शहरांतील पाटबंधारे वसाहतीमध्ये आणून जलशुध्दीकरन टँकमध्ये टाकन्यात येणार आहे. येथे पाणी वितरण टाकीत शुद्ध पाणी टाकून शहरातील विविध भागातील जलकुंभात पाणी वितरण करण्यात येणार आहे. शहरात नव्या पाच टाक्या बांधण्यात येणार असून याची पाणी साठवण क्षमता सुमारे  22 लाख लाख लिटर राहणार आहे. तर जुण्या तीन पाण्याच्या टाक्या उपयोगात येणार असून यांची क्षमता सुमारे साडे तीन लाख लिटर आहे. नागरिकांना चोवीसतास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

सध्या हे काम प्रगतीपथावर

या महत्त्वाच्या योजनेकडे मंजूर होण्यापासून ते काम सुरू होईपर्यंत पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे विशेष लक्ष आहे. तसेंच हे तातडीने पुर्ण करण्यासाठी त्यांनी एक महिण्यापुर्वी झालेल्या आढावा बैठकीत सक्त सुचना दिल्या होत्या. त्यानंतर या योजनेच्या कामाने गती घेतली आहे. सध्या हे काम प्रगतीपथावर असून निमगाव ते अर्धापूर जलवाहीनिचे काम संपत आले असून शहरातील पाणी वितरण वाहिणिचे  काम वेगाने सुरू आहे. तर जलकुंभ, पाणी शुद्धीकरन टॅक, वितरण जलकुंभ आदी काम युध्द पातळीवर सुरू आहे. हे काम पुण्यातील तेजस कंस्ट्रक्शन कंपनी करित असून प्रकल्प सल्लागार म्हणून दिपक मुळे हे काम पाहत असून कंपनीचे विनोद मिराजदार , सुधीर वडजीकर हे काम वेळेत पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करित अहेत. मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, नगराध्यक्षा सुमेरा बेगम, उपनगराध्यक्षा डाॅ पल्लवी लंगडे, नगरसेवक, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाने ,शहराध्यक्ष राजु शेटे हे काम जलदगतीने होण्यासाठी पाठपुरावा करित आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT