navratri news esakal
नवरात्र

Navratri 2022 : विधवा प्रथा न जुमानता स्वत:साठी जगायला शिकवणारी दुर्गा संगीता कांबळे

तिचे ते रूप पाहून सगळेच अवाक

Pooja Karande-Kadam

पतीच्या निधनानंतर विधवा झाल्यानंतर ज्या काही प्रथा आहेत त्यामुळे महिलेच्या सन्मानाने जगण्याच्या हक्कावर काही प्रमाणात गदा येत असल्याने अनेक ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा बंद केल्या. पण कोल्हापूर मधील एक दुर्गा अशी आहे जिने त्याआधीच या प्रथा न जुमानता समाजात परिवर्तन घडवले. आज ऐकूया तिची कहाणी

मी संगीता गुणवंत कांबळे,माझं माहेर सांगली असून सासर कोल्हापूर पण आयुष्यातील 35 वर्ष आम्ही मुंबईला राहिलो आहे. मिस्टरांच्या रिटायरमेंटनंतर आम्ही पुन्हा कोल्हापूरमध्ये शिफ्ट झालो. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. कोरोनाने सगळ्यांच्या जवळच कोणी न कोणी हिरावून नेलं तस माझ्या पतीचेही निधन झाले.

हा खूप भावनिक आणि अगदी कोलमडून पडणारी घटना होती. आयुष्याची 35 वर्ष एकत्र राहिल्यानंतर अचानक त्यांच माझ्यासोबत नसणं स्वीकारणं खूप अवघड होतं माझ्यासाठी. त्यामुळे त्यांचे सगळे विधी उरकल्यावर मी त्या प्रथा पाळायला विरोध केला. आयुष्यभर ज्याची साथ होती ते सोडून गेले. पण, त्यांच्या आठवणी मी माझ्यापासून दूर करणार नाही,अशी भूमीका मी त्यावेळी घेतली.

माझे हे रूप पाहून सगळेच अवाक झाले. त्यांना वाटत होतं आता पतीचे निधन झालं आहे तर तू विधवा रूप धारण कर. पूर्वी सती प्रथा होती. पतीच्या निधनानंतर त्याच्याच चितेवर उडी घेत पत्नीनेही आयुष्य संपवायचे. पण आता असलेल्या या प्रथा त्याहून वाईट म्हणायच्या. एखादीच्या पतीचे निधन झाले तर तिसर्‍या दिवशी महिला नुसत्या तुटून पडतात. बांगड्या फोडतात. मंगळसूत्र तोडतात. हे करताना तिच्या मनाचा विचार करायला हवा.

पतीचे निधन झाले की, सौभाग्य अलंकार घालायचे नाहीत. टिकली,बांगड्या, कलरफुल साड्या घालायच्या नाहीत. होईल तेव्हढं साधे रहायचे. पण या गोष्टी करून महिलांना काय काय ऐकावं लागत, किती वाईट नजरा सहन कराव्या लागतात. कोणत्या कार्यक्रमात जाता येत नाही. मनासारखं काही करता येत नाही. यामुळे त्या स्त्रीला अधिकच मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. मग ज्या प्रथा आपल्याला आरोग्यासाठी हानिकारक ठरत असतील.

मला डान्स,अभिनयाची आवड आहे. मी सध्या मी काही टीव्ही सीरिअल्समध्येही काम करतेय. तर सेटवर लोकांना माहिती नव्हती की माझे मिस्टर वरले आहेत. जेव्हा मीच ही गोष्ट त्यांना सांगते तेव्हा समजलं की ते कौतुक करतात. तू अशीच रहा, अस म्हणतात.

मी हा निर्णय केवळ माझ्या पतीमुळे घेऊ शकले. आमचे वैवाहिक आयुष्य अतिशय आनंदी गेलं. ते नेहमीच सांगायचे की, नवरा किंवा बायको दोघांपैकी एकाचा मृत्यू आधी होणार. त्यामुळे मी आधी गेलो तरी तू स्वत:मध्ये बदल करू नको, असे त्यांचे विचार होते. त्यामुळेच आता मला असं वाटतं की, एक माणूस निघून गेल्यावर आयुष्य बदलत नाही. त्यामुळे पतीच्या निधनानंतर काही गोष्टीत बदल होतो. पण, तो तूम्हाला पटेल असा करा. काही महिला स्वत:च याला विरोध करतात. काही समाजाला घाबरून त्या रूढी स्विकारतात. तसेच, माझे वडील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सानिध्यात वाढलेले होते. त्यामुळे त्यांनी मलाही लहानपणापासून चळवळ, समाज विरुद्ध जाण या गोष्टी शिकवल्या होत्या.

शाहु स्मारकला एक कार्यक्रम झाला होता. त्याठीकाणी मी महिलांचे प्रबोधन केले होते. त्यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी मला सांगितले की, विधवा महिलांवर आत्याचार होतोय असं समजलं किंवा तस काही वाटलं तर मला येऊन सांगा. आपण त्यावर काहीतरी ऍक्शन घेऊ.

विधवा महिलेला आधार नसतो,त्यामुळे पती नंतर तीच तिला करायचं असत त्यामुळे महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. सामाजिक पातळीवरही त्यांना मानसन्मान मिळाला पाहिजे यासाठी मी काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Card : रेशनकार्डमधून १.१७ कोटी लोकांची नावे वगळणार, केंद्राने राज्यांना पाठवली यादी; तुमचं नाव तर नाही ना ?

Pune Traffic : सिंहगड रस्तावासीयांना पुन्हा मनस्ताप; पाऊस, प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे वाहतूक कोंडी

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT