100 hectares of sugarcane land in Dighanchi 
पश्चिम महाराष्ट्र

दिघंचीत हातातोंडाला आलेला 100 हेक्‍टर ऊस भुईसपाट 

गणेश जाधव

दिघंची : वादळी पावसाने दिघंची राजेवाडी परिसरात हातातोंडाला आलेल्या 100 हेकटर ऊस भुईसपाट झाला आहे. तर डाळिंब बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तातडीने प्रशासनाने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

कायम दुष्काळी असणाऱ्या दिघांची परिसरामध्ये पावसामुळे व निंबाळकर तलावामध्ये टेंभूचे पाणी आल्याने परिसरामध्ये उसाची लागवड मोठा प्रमाणात झाली आहे. ऊसाचे पीक ही जोमात आले होते. 
लवकरच साखर कारखाने सुरू होणार आहेत. ऊस कारखान्याला जाणार या शेतकऱ्याच्या आनंदी क्षणावर मुसळधार पावसाने विरजण पडले. 

तरती मळा, मोरे मळा, कुंभार मळा, घनचरे मळा पूजारवाडी, पंढरेवाडी,राजेवाडी आदी ठिकाणी संपूर्ण क्षेत्र भुईसपाट झाले आहे. जुलै, ऑगस्टमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. वातावरण ढगाळ असल्याने त्याचा परिणाम डाळिंब भागावर झाला आहे. डाळिंब बागावर तेल्या रोगाने हल्ला केला आहे. तर उरल्या बागांचे वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. 

दिघंची परिसरामध्ये वादळी पावसाने ऊस व डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तलाठी यांनी तातडीने पंचनामे करावेत 
- सागर ढोले, ग्रा. पं. सदस्य 

आमचे हक्काचे पीक ऊस भुईसपाट झाले. तर डाळिंब मोठे नुकसान झाले आहे. आम्हाला शासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई व पीक विमा द्यावा 
- सचिन मोरे, शेतकरी 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात; सुदैवानं वाचले प्राण

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT