पश्चिम महाराष्ट्र

शेतकरी संघातील तीन संचालकांकडे १३ लाख थकीत

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - शिरोळ शाखेत ३६ लाखांचा गैरव्यवहार झाल्यानंतर शेतकरी सहकारी संघ पुन्हा चर्चेत आला आहे. संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक आणि पन्हाळा तालुक्‍यातील एका माजी संचालकांनी दीड वर्षापासून संघाकडून घेतलेली एकूण १३ लाख ६६ हजार ‘उधारी’ (कॅशक्रेडिट) परत केलेली नाही.

वसुलीसाठी अध्यक्ष, प्रशासन किंवा थकबाकी नसणाऱ्या संचालकांनी मौन धारण करत ‘संघाचा बैल’ थकबाकीदार संचालकांच्या दावणीला बांधला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. एका संचालकाने लाख रुपयाची रोकड उचल करून डिझेल आणि खत खरेदी केली म्हणून नोंद करण्याचा आदेश संबंधित शाखा अधिकाऱ्याला दिला होता. त्यामुळे गैरव्यवहारामुळे चर्चेत येत असलेला संघ काही संचालकांच्या मनमानीमुळेही अडचणीत येत असल्याचे चित्र आहे.

संघाच्या एका माजी अध्यक्षाने १० लाख रुपयांची ‘उधारी’ मुलाच्या व संबंधित एकाच्या नावावर दोन ते अडीच लाख रुपयांचे खत व इतर ‘उधारी’ केली आहे, अशी सुमारे १२ लाख रुपयांची ‘उधारी’ दीड वर्षापासून परत केलेली नाही. एकीकडे संघाला जिल्हा बॅंकेतून कर्ज काढून व्याज भरावे लागत असताना दुसरीकडे संचालक मात्र दहा ते बारा लाख बिनव्याजी वापरत आहेत. भ्रष्ट कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम केले जात असताना संचालकांनीही आत्मपरीक्षण करून थकबाकी वेळेत परतफेड केली पाहिजे.

एका ज्येष्ठ संचालकाने मे २०१८ मध्ये ६८ हजार रुपयांची ‘उधारी’ केली आहे. अद्यापही त्याची परतफेड केलेली नाही. हेच संचालक संघाची थकीत वसुलीसाठी कठोर पावले उचलतात, असे जाहीरपणे सांगत फिरतात. पन्हाळा तालुक्‍यातील एका माजी संचालकाने भोगावती, शाहूनगर येथील शेतकरी संघाच्या शाखेतून १ लाखांची उचल केली आहे, हेच संचालक १ लाख रुपयांचे खत, डिझेल खरेदी केली म्हणून दाखवतात, असे संबंधित शाखा अधिकाऱ्यांना सांगत होते.

या संचालकांनीही ८ महिन्यांपूर्वी बिनव्याजी १ लाख रुपये घेतले आहेत. परतफेड करायचे अद्यापही नाव घेत नाही. त्यामुळे जाहीर भाषणात संघ सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी चालवला जात असल्याचे सांगायचे आणि स्वत: लाखो रुपयांची खते किंवा रोकड बिनव्याजी वापरायची, हे बंद झाल्याशिवाय शेतकरी संघातील गैरकारभाराला आळा बसणार नाही, असे बोलले जात आहे. 

अध्यक्ष व इतर काही संचालकांनी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या गैरव्यवहाराची रक्कम वसूल केली जात आहे. तशीच रक्कम या थकबाकीत असणाऱ्या संचालकांकडून वसूल केली पाहिजे, अशी मागणी सभासदांमधून होत आहे.

कारभाऱ्यांना बोलणार कोण?
संघाकडून ज्याच्या त्याच्या पत आणि परिस्थितीनुसार ‘उधारी’ दिली जाते. यामध्ये महिन्यात ‘उधारी’ भरावी लागते; मात्र वर्ष-दीड वर्ष रक्कम भरली जात नाही. हे कारभारी संचालक असल्याने यांना बोलणार कोण? असे म्हणून प्रशासनही दुर्लक्ष करते. परिणामी याचा फटका संघाला आणि सभासदांना बसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT