rakhi pornimaA 
पश्चिम महाराष्ट्र

खाऊच्या पैशातून सिमेवरील जवानांसाठी बनवल्या राख्या

हरिभाऊ दिघे

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून पाचशेहून अधिक राख्या स्वत: बनवल्या असून या सर्व राख्या सिमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना पाठवण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

सिमेवरील अनेक भारतीय जवानांना राखी पौर्णिमेला आपल्या घरी येता येत नाही. त्यामुळे शिक्षक अजित कांबळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून राख्या तयार करुन घेऊन सैनिकांना त्या पाठवाव्या असा विचार त्यांच्या मनात आला आणि ही संकल्पना त्यांनी मुख्याध्यापक जी.ए. कागदे यांच्यापुढे मांडली. याला त्यांनी संमतीही दिली.


त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून राख्या बनवण्यासाठी रंगीत सुती धागे आणि अन्य कलात्मक साहित्य आणले आणि विविध प्रकारच्या डिझाईनच्या राख्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. शाळेने राख्यांसाठी येणारा खर्च देऊ केला असता मुला- मुलींनी तो घेण्यास नकार दिला. या विद्यार्थ्यांना शिक्षिका श्रीमती रोहीनी रासकर, प्रा.विजय खाडे, श्रीमती आभाळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आकर्षक अशा राख्यांचे ग्रामस्थांनीही कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT