3 thousand form first day application teacher transfer 
पश्चिम महाराष्ट्र

शिक्षक बदलीसाठी पहिल्याच  दिवशी 3 हजार अर्ज 

मिलिंद देसाई

बेळगाव : शिक्षण खात्याने बदली प्रक्रियेला चालना देताच मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले जात असून शिक्षक मित्र ऍपच्या माध्यमातून  पहिल्याच दिवशी 3000 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 


रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून वेळापत्रक जाहीर होताच  शिक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच बदलीसाठी अर्ज करण्यात सुरवात केली असून शिक्षकांना 30 तारखेपर्यंत अर्ज दाखल झाले आहेत  16  व 17 डिसेंबर रोजी प्राथमिक तर 18 ते 19 रोजी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदलीसाठी कौंशीलिंग होणार आहे. यासाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यातून 1 लाखाहून अधिक अर्ज दाखल होतील अशी अपेक्षा शिक्षण खात्यातून व्यक्त होत आहे. 


दरवेळी बदली प्रक्रियेवेळी तांत्रिक अडचण निर्माण होते त्यामुळे प्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ शिक्षण खात्यावर येते मात्र यावेळी प्रक्रिया सुरळीतरित्या पार पडावी यासाठी शिक्षण नवे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यामुळे कौंशिलिंग वेळेत पार पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 


गेल्या वर्षी सक्तीची बदली करण्यात आलेल्या शिक्षकांनाही यावेळी बदलीसाठी अर्ज करता येणार आहेत त्यामुळे यावेळी अर्जांची संख्या वाढणार आहे तसेच 3 वर्षे पूर्ण झालेले व परस्पर बदलीसाठीही अधिक संख्येने अर्ज दाखल होण्याची 
शक्यता आहे. 

शिक्षक मित्र ऍपमुळे शिक्षकांना अर्ज करणे सुलभ झाले आहे बदली प्रक्रियेत यावेळी अधिक संख्येने शिक्षक भाग घेतील असे वाटते 
अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

संपादन- अर्चना बनगे



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT