Sangli Flood esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Flood : पूरबाधित तालुक्यांत तब्बल 3,088 घरे धोकादायक; जिल्ह्यात 109 गावांचा सर्व्हे

सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पूरबाधित (Sangli Flood) १०९ गावांमध्ये ३०८८ धोकादायक घरे आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला आहे. अतिधोकादायक असलेल्या इमारतींच्या मालकांना नोटीस बजावली आहे.

सांगली : जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पूरबाधित (Sangli Flood) १०९ गावांमध्ये ३०८८ धोकादायक घरे आहेत. संबंधित घरांच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. धोकादायक घरे, इमारती लवकर उतरवून घ्याव्यात किंवा पाडून टाकाव्यात. पावसाळ्यात कोणती दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी प्रशासनावर राहणार नाही, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरग्रस्त तालुक्यांतील १०९ गावांचा सर्व्हे करण्यात आला. या गावांमधील धोकादायक, तसेच पडलेल्या इमारतींची माहिती घेण्यात आली आहे. पडझड झालेली, कमी धोकादायक, अतिधोकादायक, दुरवस्था झालेली घरे, इमारतींची माहिती घेण्यात आली आहे. ज्या इमारती अधिक धोकादायक आहेत, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज या चार तालुक्यांना पुराचा फटका बसतो. पावसाळ्यात या चार तालुक्यांतील १०४ गावे संभाव्य पूरग्रस्त म्हणून विशेष लक्ष दिले जाते. सन २००५, २००६ तसेच २०१९ आणि २०२० या वर्षी आलेल्या महापुराचा फटका या गावांना बसला होता. त्यामुळे प्रतिवर्षी पावसाळ्यात १०४ गावांकडे जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष असते. या गावांमधील आरोग्य व्यवस्था, तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता याचे काटेकोर नियोजन जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पावसाळ्याच्या काळात धोकादायक, पडझड झालेली, दुरवस्था झालेली घरे, इमारती पडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी त्यांचे सर्वेक्षण करून संबंधित मालमत्ताधारकांना सुरक्षिततेविषयी काळजी घेण्याबाबत नोटिसा बजावल्या जातात. यंदाही पावसाळ्यापूर्वीच वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज या संभाव्य पूरबाधित तालुक्यांतील १०९ गावांचा सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ३०८८ धोकादायक घरे, इमारती आहेत, तर ५६० घरे पडली आहेत.

वाळवा पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ३६ गावे, पलूस तालुक्यातील ३३ गावे, शिराळा तालुक्यातील २१ गावे आणि मिरज तालुक्यातील १९ गावे अशा १०९ गावांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये एक लाख दहा हजारांहून अधिक घरे समाविष्ट आहेत. त्यातील १७१० घरांना नोटिसा बजावल्या आहेत. या चारही तालुक्यांतील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित गावच्या तलाठ्यांमार्फत या नोटिसा बजावल्या आहेत.

तालुका गावे घरे धोकादायक पडलेली नोटीस बजावलेली गावे

  • मिरज १९ २२८५५ ५५३ ७२ ८४

  • पलूस ३३ ३७१५६ ९०५ १४६ ९५४

  • शिराळा २१ १६९३९ २६३ ११९ २३९

  • वाळवा ३६ ३३४७० १३६७ २२३ ४३३

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला आहे. अतिधोकादायक असलेल्या इमारतींच्या मालकांना नोटीस बजावली आहे. पावसाळ्यात या मालमत्तांना धोका असतो. त्यामुळे या घरे, इमारतीमधील नागरिकांनी सुरक्षित स्थळी आपली व्यवस्था करावी. जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास जीवित-वित्तहानी होणार नाही.

- शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT