67 bridges in Atpadi taluka due to heavy rains
67 bridges in Atpadi taluka due to heavy rains 
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडीत तालुक्‍यात अतिवृष्टीने 67 पुलांची वाताहत 

नागेश गायकवाड

आटपाडी : अतिवृष्टीच्या दणक्‍याने तालुक्‍यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील तीन, जिल्हा मार्गावरील चार आणि जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रस्त्यांवरील तब्बल दहा पुलांची दुर्दशा झाली आहे. काहींचे भराव वाहून गेलेत, तर काही पूलच वाहून गेले. एकूणच या पावसात तालुक्‍यातील अनेक पुलांचा खुळखुळा, तर रस्त्यांची चाळण झाली आहे. 

आटपाडी तालुक्‍यात यावर्षी अतिवृष्टीने मोठा धुमाकूळ घातला. या अतिवृष्टीचा दणका तालुक्‍यातील अनेक रस्ते आणि पुलांना बसला आहे. तालुक्‍यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पुजारवाडी, दिघंची आटपाडी रस्त्यावरील जाधव मठ आणि शेटफळे येथील पुलाचे भाराव आणि लगतचे रस्ते वाहून गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत केली आहे. 

जिल्हा मार्गावरील करगणी- चिंचघाट, दिघंची- निंबवडे, कौठळी आणि नेलकरंजी पूल वाहून गेले असून, रस्त्याचेही तेवढेच नुकसान झाले आहे. तसेच जिल्हा परिषदेकडे असलेल्या करगणी- शेटफळे, करगणी माळेवाडी, करगणी- तळेवाडी, शेंडगेवाडी, खरसुंडी- वलवण, शेटफळे- रेबाईमळा, वलवण येथील शिंदेवस्ती, दिघंची येथील ढोलेमळा आणि महाडिकमळा, खानजोडवाडी, कतडवळे येथील मरगळे वस्ती आणि बाळेवाडी येथील कोळेकरवस्ती वरील पूल वाहून गेले असून; अद्याप रस्ते पाण्याखालीच आहेत. 

याशिवाय प्रत्येक गावातून वाडी-वस्तीवर जाण्यासाठी विविध फंडांतून आणि रोजगार हमी योजनेतून डांबरीकरण- मुरमीकरण केलेल्या रस्त्यांवरील पन्नासहून अधिक मोरी, पूल वाहून गेले आहेत. गावातून वाडी-वस्तीवर जाणारे बहुतांश रस्त्याची मोठी वाताहत झाली आहे. 

अतिवृष्टीचा दणका बसलेले पूल 
- राज्य मार्गावरील पूल - 3 
- जिल्हा मार्गावरील पूल - 4 
- जिल्हा परिषद रस्त्यावरील पूल- 10 
- गावातून वाडी-वस्तीवर जाणारे पूल-मोरी - 50

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT