80 crores of loan waiver of flood-hit farmers comes ... 
पश्चिम महाराष्ट्र

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे 80 कोटी आले...

सकाळवृत्तसेवा

सांगली ः ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे चार तालुक्‍यांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. महापुराने 52 हजार हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित झाले होते. पूरबाधित शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचे कर्ज माफ आणि बिगर कर्जदारांना तिप्पट नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यातील 28 हजार 404 शेतकऱ्यांचा 186 कोटी रुपयांची कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला होता. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्यात 80 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. जिल्हा उपनिबंधांकडून याद्या तयार करण्यात येत आहेत. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 

वाळवा, पलूस, शिराळा आणि मिरज तालुक्‍यांतील शेतीसह जनावरांचे मोठे नुकसान झाले होते. चार तालुक्‍यांतील 104 गावांना फटका बसला होता. एक लाख चौदा हजार बाधित कुटुंब आहेत. जिल्ह्यातील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजर अंदाजे 66 हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले होते. प्रत्यक्षात पंचनामा झाल्यानंतर सुमारे 52 हजार हेक्‍टरवरील पिके वाया गेल्याचे स्पष्ट झाले होते.

शेती पिकांच्या नुकसानीत सर्वाधिक नुकसान उसाचे म्हणजे 36 हजार हेक्‍टर क्षेत्रातील झाले होते. त्यानंतर मक्का, सोयाबीन, केळी, द्राक्षांसह अन्य क्षेत्राचा समावेश आहे. पिकांचे नुकसान काढताना सरासरी उत्पन्न आणि हमीभावाप्रमाणे काढण्यात आले आहे. गाय, म्हैस, जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर, बैल, वासरू, गाढव, अशा 62 हजार 145 अशा पशुधनाचे नुकसान झाले. त्याचे 1 कोटी 43 लाखांचे नुकसान झाले होते. 
महापुराच्या कालावधीत शासनाकडून अपेक्षित मदत मिळणे आवश्‍यक होते.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे कर्ज नाही, त्यांना तिप्पट नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे नुकसानीची आकडेवाडी निश्‍चित केली. त्यानंतर प्रशासनाने कर्जदार शेतकरी तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांची यादी तयार करून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला पाठविला आहे. 28 हजार 404 पूरबाधित शेतकरी असून 186 कोटी रुपयांची कर्जमाफीचा प्रस्ताव दिला होता.

याशिवाय तिप्पट नुकसान भरपाईसाठी कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील 92 हजार 441 शेतकऱ्यांचे 38 हजार 116 हेक्‍टरवरील नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी 130 कोटी 64 लाख रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी 80 कोटींची रक्कम प्राप्त झाली असून ती शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: तापमान आणखी वाढणार; घाटमाथ्‍यावर आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता,कसे असेल हवामान? जाणून घ्या

Swachh Survekshan:आनंदाची बातमी! 'स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत' कऱ्हाड देशात अव्वल; दिल्लीत हाेणार गौरव, सलग सहाव्यांदा पुरस्कार पटकावला

Pune News: वाकडमध्ये फ्लॅटसाठी विवाहितेचा छळ; सासरच्या व्यक्तींची शिक्षा कायम

मोठी बातमी! आता विद्यार्थी अन् प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक; वर्गातच असणार बायोमेट्रिकची मशिन; परीक्षेसाठी ७५ टक्के उपस्थिती आवश्यक

Beet Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

SCROLL FOR NEXT