80 crores of loan waiver of flood-hit farmers comes ... 
पश्चिम महाराष्ट्र

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे 80 कोटी आले...

सकाळवृत्तसेवा

सांगली ः ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे चार तालुक्‍यांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. महापुराने 52 हजार हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित झाले होते. पूरबाधित शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचे कर्ज माफ आणि बिगर कर्जदारांना तिप्पट नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यातील 28 हजार 404 शेतकऱ्यांचा 186 कोटी रुपयांची कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला होता. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्यात 80 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. जिल्हा उपनिबंधांकडून याद्या तयार करण्यात येत आहेत. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 

वाळवा, पलूस, शिराळा आणि मिरज तालुक्‍यांतील शेतीसह जनावरांचे मोठे नुकसान झाले होते. चार तालुक्‍यांतील 104 गावांना फटका बसला होता. एक लाख चौदा हजार बाधित कुटुंब आहेत. जिल्ह्यातील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजर अंदाजे 66 हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले होते. प्रत्यक्षात पंचनामा झाल्यानंतर सुमारे 52 हजार हेक्‍टरवरील पिके वाया गेल्याचे स्पष्ट झाले होते.

शेती पिकांच्या नुकसानीत सर्वाधिक नुकसान उसाचे म्हणजे 36 हजार हेक्‍टर क्षेत्रातील झाले होते. त्यानंतर मक्का, सोयाबीन, केळी, द्राक्षांसह अन्य क्षेत्राचा समावेश आहे. पिकांचे नुकसान काढताना सरासरी उत्पन्न आणि हमीभावाप्रमाणे काढण्यात आले आहे. गाय, म्हैस, जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर, बैल, वासरू, गाढव, अशा 62 हजार 145 अशा पशुधनाचे नुकसान झाले. त्याचे 1 कोटी 43 लाखांचे नुकसान झाले होते. 
महापुराच्या कालावधीत शासनाकडून अपेक्षित मदत मिळणे आवश्‍यक होते.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे कर्ज नाही, त्यांना तिप्पट नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे नुकसानीची आकडेवाडी निश्‍चित केली. त्यानंतर प्रशासनाने कर्जदार शेतकरी तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांची यादी तयार करून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला पाठविला आहे. 28 हजार 404 पूरबाधित शेतकरी असून 186 कोटी रुपयांची कर्जमाफीचा प्रस्ताव दिला होता.

याशिवाय तिप्पट नुकसान भरपाईसाठी कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील 92 हजार 441 शेतकऱ्यांचे 38 हजार 116 हेक्‍टरवरील नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी 130 कोटी 64 लाख रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी 80 कोटींची रक्कम प्राप्त झाली असून ती शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

IPL म्हणजे बिझनेस, मनोरंजन... क्रिकेट नाहीच! काव्या मारनच्या संघातील सदस्याचा मोठा दावा; म्हणाला, इथे खेळाच्या विकासापेक्षा...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तहसील येथे चर्मकार समाजाचे निदर्शने करत आंदोलन

Maharashtra Result Day : राज्य मंडळाचा नवा निर्णय; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार

Grandson Property Rights India : ... तर आजोबाच्या संपत्तीत नातवाला मिळणार नाही हिस्सा, नवा नियम काय सांगतो ?

SCROLL FOR NEXT