Sangli Crime News
Sangli Crime News esakal
पश्चिम महाराष्ट्र

गुप्तधन प्रकरण: सांगलीत सामूहिक आत्महत्या नाही तर 9 जणांची हत्या

सकाळ डिजिटल टीम

या प्रकरणी पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय.

सांगलीमधील (Sangli District) मिरज तालुक्यातील (Miraj Taluka) म्हैसाळ (Mhaisal) येथील एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्यानं जिल्हा हादरला होता. ही आत्महत्या सावकारी कर्जापोटीच झाल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं होतं. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात (Miraj Rural Police Station) तब्बल 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता म्हैसाळमधील या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय.

या प्रकरणी पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय. त्या 9 जणांची आत्महत्या नसून हत्याकांड झाल्याचं समोर आलंय. दोघांनी या लोकांच्या जेवणात विष घालून त्यांना मारल्याचं तपासात उघड झालंय. यामध्ये गुप्तधनाच्या कारणामुळं हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून या प्रकरणी एका मंत्रिकासह एकाला पोलिसांनी अटक केलीय, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलीय.

या घटनेत नव्यानं अटक केलेले दोघे संशयित आरोपी हे मयतांच्या घरी येत होते, असंही समोर आलंय. यावेळी आरोपी आणि मयतामध्ये गुप्तधनाच्या चर्चा होत होत्या, अशीही माहिती आहे. त्यामुळं गुप्तधनाच्या विषयावरूनच यातून 9 जणांच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामध्ये दोन व्यक्तींनी या लोकांच्या जेवणात विष घालून त्यांना मारलं असून या प्रकरणी दोघंजण अटकेत आहेत, तर दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहितीही गेडाम यांनी दिलीय.

या खून प्रकरणी आब्बास महमंदअली बागवान (वय ४८) रा. मुस्लीम बाशा पेठ, मुलेगाव रोड, सरवदेनगर सोलापूर आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय ३०) रा. वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, प्लॉट नं ५९ जुना पुणानाका, सोलापूर या दोघांना अटक करण्यात आलीय. त्यामुळं गुप्तधनाच्या विषयावरूनच ही हत्या झाल्याचं आता समोर आलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT