पश्चिम महाराष्ट्र

सुजय दादा, क्या हुआ आप का वादा?; 'ही' अभिनेत्री उपोषण करण्यावर ठाम

वृत्तसंस्था

नगर- मुख्यमंत्री व खासदार सुजय विखे आता साकळाई बाबत काही बोलत नाहीत. पण योजना होईपर्यंत मी शांत बसणार नाही. त्यासाठीच येत्या क्रांती दिनापासुन मी उपोषणास बसणार आहे अशी माहिती अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिली आहे.

2014 मध्ये आम आदमी पक्षाकडून लोकसभेची नगर मतदारसंघाची निवडणूक लढवून चर्चेत आलेल्या दीपाली यांनी आता श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर श्रीगोंदे व नगर तालुक्यातील 35 गावासाठी लाभदायी ठरणाऱ्या साकळाई पाणी योजनेचा प्रश्न त्यांनी हाती घेतला आहे. यासाठी त्यांनी मध्यंतरी रस्ता रोको आंदोलनही केले होते व आता येत्या 9 ऑगस्टला जिल्हा परिषदेत उपोषण आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात त्यांनी भूमिका मांडली.

नगर व श्रीगोंदे तालुक्यातील 335 गावांसाठी वरदान मानल्या जात असलेल्या साकळाई पाणी योजनेला पर्यायी योजना देऊन संबंधित गावांना हक्काचे पाणी मिळवून देऊ शकते,' असा दावा अभिनेत्री व शिवसंग्राम पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष दीपाली सय्यद यांनी मंगळवारी केला. दरम्यान, साकळाई योजनेसाठी येत्या 9 ऑगस्टला उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय कायम असून, त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, 'साकळाई योजनेवर फक्त राजकारण सुरू आहे. निवडणुकीपुरती यावर चर्चा होते व त्यानंतर पुढे काहीच होत नाही. श्रीगोंद्यातील काही भाग जसा हरित आहे, तसा साकळाई गावासह रुईछत्तीशी, वाळकी, गुंडेगाव परिसरातील भागही साकळाई योजनेने हरित होऊ शकतो, पण याबाबत खा. डॉ. सुजय विखेही यावर आता काही बोलत नाहीत', अशी टीका दिपाली सय्यद यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT