सांगली- जिल्ह्यातील एकरकमी एफआरपीसाठी आंदोलनाचा भडका उडालेला आहे. जिल्ह्यातील सुरवातील तीन कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली. आंदोलनानंतर आणखी दोन कारखान्यांनी संमती दर्शवली. त्यानंतर इतर कारखाने अद्याप राजी झाले नाहीत. तशातच आज राजारामबापू कारखान्याचे सावळवाडी (ता. मिरज) येथील गट कार्यालय पेटवून दिल्याचा प्रकार घडला. अज्ञातानी हे कार्यालय पेटवल्याची माहिती पुढे आली आहे. परंतू एफआरपीसाठीच पेटवले हे निश्चित आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात ऊसदरासाठी बैठक झाली होती. त्या बैठकीत कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले. परंतू हंगाम सुरू झाल्यानंतर केवळ सोनहिरा, उदगिरी शुगर आणि निनाईदेवी या तीनच कारखान्यांनी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली. इतर कारखान्यांनी 2500 रूपयेप्रमाणे पहिला हप्ता देण्यास प्रारंभ केला. एकरकमी एफआरपीसाठी क्रांती कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय पेटवल्याचा प्रकार घडला. त्यानंतर आमदार अरूण लाड यांनी एकरकमी एफआरपीची रक्कम मागेल त्या शेतकऱ्यांना देण्याचे कबुल केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसंतदादा कारखाना चालवणाऱ्या दत्त इंडिया कंपनीसमोर नुकतेच आंदोलन केले. तेव्हा कंपनीने एकरकमी एफआरपी देण्याचे कबुल केले. तसेच आतापर्यंत ज्यांना पहिला हप्ता दिला, त्यांना दुसरा हप्ता दहा दिवसात देण्याचे मान्य केले. त्यामुळे आतापर्यंत पाच कारखाने एकरकमीसाठी राजी झाले आहेत. तशातच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याचे सावळवाडी येथील गट कार्यालय पेटवून दिल्याचा प्रकार आज सकाळी घडला. कार्यालयातील फर्निचर, कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. या आंदोलनाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्विकारली नाही. परंतू कार्यालय पेटवण्यामागे एकरकमी एफआरपीचे कारण असल्याचे पुढे आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.