Gramsabha 
पश्चिम महाराष्ट्र

अण्णा हजारे यांचे उपोषणानंतर राळेगणसिद्धीत स्वागत

मार्तंडराव बुचुडे

राळेगणसिद्धी (नगर) : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे दिल्ली येथून राळेगणसिद्धी येथे आगमन होताच उपस्थीत ग्रामस्थांनी व महिलांनी फुले उधळून हजारे यांचे स्वागत केले. या वेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले.

हजारे गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी प्रथम येथील यादवबाबा मंदीरात यादवबाबांचे दर्शन घेतले व नंतरच त्यांनी उपस्थीत ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या रेट्यापुढे तसेच देशभरातील कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला जनतेच्या दबावापुढे झुकावे लागले. या आंदोलन मुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळाला तर देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील मात्र त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल असेही हजारे म्हणाले. हा लाभ संबध देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे.

हजारे यांनी ग्रामस्थांनी माझ्या आंदोलनाच्या काळात सलग सात दिवस गावात विविध प्रकारची आंदोलने केली त्यामुळे सरकार झुकले आहे. एका गावाची शक्ती किती अफाट असते ते या आंदोलनातून समाजाला दिसून आले आहे. या वेळी हजारे यांनी केलेल्या आंदोलनाबाबत व सहकार्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.     

हजारे पुढे म्हणाले, सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या आहेत. तसे लेखी पत्र पंतप्रधान कार्यालयाच्या मंत्र्यांनी दिले आहे. शेतकऱ्यांची सध्या स्थिती अतीशय वाईट झाली आहे. त्यांना न्याय मिळत नाही. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या प्रमाणात बाजारभाव मिळत नसल्याने शेतीत नुकसान होते. त्या मुळे तो आत्महत्या करतो. शेतात राबतो त्याला योग्य बाजारभाव मिळाला पाहीजे तर तो शेतकरी करतो या पुढे शेतकरी आत्महत्या करणार नाही.

हजारे आज दिल्ली येथून दुपारी 12 वाजता राळेगण सिद्धी येथे पोहचले, प्रथम यादवबाबांचे दर्शन घेतले व नंतर उपस्थीतांशी सवांद साधला. गेली सात दिवस हजारे दिल्ली येथील रामलिला मैदानावर आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणास बसले होते.     

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, वयोवृद्ध शेतकरा्यांना पेऩ्शन मिळावी, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची तात्काळ अंमल बजावणी करावी तसेच निवडणुक कायद्यात सुधारणा करावी या मागण्यासाठी 23 मार्च हजारे बेमुदत उपोषणास बसले होते. गुरूवारी (ता. 29 ) केंद्रीय कृषी मंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर व पंतप्रधन कार्यालयाने मागण्यांबाबत लेखी अश्वासन दिल्या नंतर सातव्या दिवशी हजारे यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र त्यांना खूप थकवा जाणवत असल्याने त्यांनी काल शुक्रवारी महाराष्ट्र सदनला एक दिवस आराम करणे पसंत केले, आज शनिवारी सकाळी दिल्ली येथून ते थेट राळेगणसिद्धी येथे दुपारी पोहचले.     

आज सायंकाळी आठ वाजता राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी ग्रामसभेचे आयोजन केले असून या ग्रामसभेत हजारे यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येणार आहे. या वेळी आंदोलनात हजारे यांना य़श मिळाले म्हणून व आमचे दैवत सुखरूप परतले या निमित्ताने गावात ग्रामसभेत पेढे वाटप करूण आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT