पश्चिम महाराष्ट्र

रवींद्र लाखे यांना इंदिरा संत उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - येथील आपटे वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार रवींद्र लाखे (कल्याण) तर उत्कृष्ट मराठी गद्य साहित्य पुरस्कार डॉ. कीर्ती मुळीक व आप्पासाहेब जकाते-यादव यांना जाहीर झाला. याचबरोबर विविध विभागातील पुरस्कारही आज जाहीर झाले. कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ व येथील ऍड. माधुरी काजवे यांचाही पुरस्कार प्राप्तव्यक्तींत समावेश आहे. 

पुरस्कार वितरण समारंभ 13 जुलै रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ही माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष अॅड. स्वानंद कुलकर्णी व इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विलास शहा यांनी दिली. 

इंदिरा संत पुरस्कार काव्यसंग्रहामध्ये संपर्क क्षेत्राच्या बाहेर याला तर गद्य साहित्यिकमध्ये डॉ. आनंद यादव एक साहित्यिक प्रवास या पुस्तकाला जाहीर झाला आहे. प्रत्येकी 5 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सौ. आशाताई सौंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार डॉ. राजेंद्र माने (सातारा) यांच्या सांज सावल्या कथासंग्रहाला, वि. मा. शेळके गुरूजी उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, रवी राजमाने (येळावी, सांगली) यांच्या वाळवाण कादंबरीला जाहीर झाला आहे. 

उत्कृष्ट अनुवादसाठीचा महादेव जाधव पुरस्कार मधुकर धर्मापूरीकर (नांदेड) यांच्या डिप्टी कलक्‍टरी अनुवाद तथा अनुभव या पुस्तकास, लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार इरफान शेख (चंद्रपूर) यांच्या माझ्यातला कवी मरत चाललाय व संजय पाटील पनवेल यांच्या हरवलेल्या कवितांची वही काव्य संग्रहाला जाहीर झाला आहे. 

विशेष लक्षणीय गद्य साहित्यकृती पुरस्कार डॉ. वि. दा. वासमकर (सांगली) यांच्या मराठीतील कलावादी समीक्षा व डॉ. संदीप श्रोत्री (सातारा) यांच्या कासवानची भेट पुस्तकाला, शामराव भिडे ललित गद्य पुरस्कार प्रकाश राणे (मुंबई) यांच्या बारा मतीची माणसं पुस्तकाला जाहीर झाला आहे.

पार्वती तेलसिंगे बाल साहित्यकृती पुरस्कार कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांच्या जॉयस्टिक या पुस्तकाला तर स्थानिक गौरव पुरस्कार माधुरी काजवे व उत्कृष्ट वाचक पुरस्कार नंदकुमार बंडगर यांना जाहीर झाला आहे. 

परीक्षक म्हणून डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रा. भीमराव पाटील, बलवंत जेवुलकर, प्रा. नंदकुमार मोरे, रजनी हिरळीकर, बाबूराव शिरसाट व निलम माणगावे यांनी काम पाहिले. 

निधीतून पुरस्कार 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1974 मध्ये इचलकरंजीत झाले होते. या संमेलनातून शिल्लक राहिलेल्या निधीतून इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट स्थापन केले आहे. ट्रस्टमार्फत दरवर्षी त्या वर्षामध्ये प्रसिद्ध झालेल्या साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात, तसचे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

COVID-19 Vaccine Side Effects : कोविड-१९ लसीचे दुष्परिणाम आणि नुकसानभरपाईबाबत ठोस धोरण तयार करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा! सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाला...

Aadhaar Card Correction : सावधान! आधार कार्डच्या 3 किरकोळ चुकांमुळे बंद होऊ शकते तुमचे बँक खाते; लगेच करून घ्या 'हा' बदल

Ichalkaranji Latest Crime : इचलकरंजीच्या तारदाळमधील दर्गा चौकात राजकीय वाद उफाळला, थेट चाकूने छाती, पोटावर वार केले अन्

Chef Kunal Kapoor: डाएट करताय पण तेच ते बेचव खाऊन कंटाळा आलाय? मग शेफ कुणाल कपूरची फायबर रिच मिलेट खिचडी आजच ट्राय करा

SCROLL FOR NEXT