पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरात जमावबंदी लागू; सरकारचा कातडी वाचवण्याचा प्रयत्न, विरोधकांची टीका

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी 12 ते 24 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत जमाव बंदी आदेश जारी करण्यात येत आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापुर आला. सर्व जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37(3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. 

दरम्यान सरकारच्या या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले असून, सरकार साफ अपयशी ठरले आहे. जनता यांच्या विरोधात रोष व्यक्त करणारच म्हणून स्वतःची कातडी वाचवण्याचा सरकारचा हा केविलवाणा प्रयत्न असून या सरकारने आज इंग्रजांची आठवण करून दिली आहे. हे सरकार स्वार्थी असल्याची टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

ह्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असंच विचारायची वेळ आता आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आता त्यांनी 24 ऑगस्ट पर्यंत जमावबंदी लागू केली आहे. वेगवेगळे विचित्र फतवे काढून हे सरकार पूरग्रस्तांच्या संकटात वाढ करण्याचं काम करत आहे. याचा आम्ही निषेध करत असल्याचे मत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले आहे.

तर, पूरग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांसहित भाजप नेत्यांना मदती संदर्भात जाब विचारला याचा राग मनात धरून पूरग्रस्तांवर सरकाचा हा सूड उगवण्याचा प्रयत्न आहे. सरकार स्वतः कुठलीही मदत करायची नाही आणि इतर पक्ष व सामाजिक संघटनांनाही ती करु द्यायची नाही म्हणून सरकारने जमावबंदी केल्याचे स्पष्ट दिसत असल्याची टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT