Court Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : बायपासची स्थगिती कायम, महामार्ग प्राधिकरण तोंडघशी

शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी महामार्ग प्राधिकरणाचे सर्व दावे खोडून काढल्यामुळे कामाला स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.

मिलिंद देसाई

बेळगाव : हलगा मच्छे बायपासला न्यायालयाने स्थगिती दिलेली असतानाही गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी बायपासचे काम सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्यासाठी न्यायालयात बाजू मांडली मात्र शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी महामार्ग प्राधिकरणाचे सर्व दावे खोडून काढल्यामुळे कामाला स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.

हलगा मच्छे बायपासला शेतकऱ्यांचा पूर्ण विरोध असताना देखील दडपशाहीकरीत काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत कामाला विरोध केला होता. तसेच याबाबत न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर न्यायालयाने शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत झिरो पॉईंट निश्चित केल्याशिवाय बायपासचे काम सुरू कराता येणार नाही असे सांगत कामाला देण्यात आलेली स्थगिती कायम ठेवली होती.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कामाला विलंब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली होती मात्र शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी महामार्ग प्राधिकरणाचे सर्व दावे खोडून काढत शेतकऱ्यांवर कशाप्रकारे अन्याय होत आहे हे निदर्शनास आणून दिले होते त्यामुळे कामाला स्थगिती मिळाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.मात्र पुन्हा एकदा प्राधिकरणाकडून स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत काम बंद झाल्यामुळे नुकसान सहन करावे लागत असल्याचे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न प्राधिकरणाकडून केला जात आहे.

मात्र न्यायालयाने पुन्हा एकदा कामाला स्थगिती कायम ठेवली आहे. बायपासच्या विरोधात 50 हून अधिक शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच इतर शेतकऱ्यांचाही या कामाला पूर्णपणे विरोध असून कोणत्याही परिस्थितीत काम सुरू होऊ नये अशी अपेक्ष शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. मात्र न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे काम बंद असले तरी प्राधिकरणाकडून विविध प्रकारे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने शेतकऱ्यांनी सजग राहणे गरजेचे आहे असे मत व्यक्त होत आहे.

बायपासमूळे शहर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात सुरू होणार असल्याने बायपास रद्द व्हावा यासाठी म ए समितीच्या कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनाही प्रयत्न करा अशी मागणी केली आहे त्यानुसार पवार हे लवकरच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या बरोबर चर्चा करणार आहेत. त्यामुळे सर्व बाजुनी रस्त्याचे काम बंद व्हावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT