belgaum weaver sale sarees demand for state government karnataka 
पश्चिम महाराष्ट्र

राज्यभरातील विणकरांनी विणलेल्या पंधरा लाखांहून अधिक साड्या पडूनच

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोना संकटामुळे राज्यातील विणकर बांधवांची परिस्थिती दयनीय बनली आहे. यामुळे राज्य सरकारने त्यांच्या विकासासाठी विणकर महामंडळाची स्थापना करावी आणि या मंडळासाठी 100 कोटी रुपये मंजूर करावेत, अशी मागणी राज्यातील विविध विणकर संघटना आणि नेत्यांच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. 


मुख्यमंत्र्यांनीही विणकर प्राधिकार मंडळ स्थापन करण्याबाबत आश्वासन दिले आहे. उत्तर कर्नाटक विणकर विकास संघटनेच्या वतीने ही या मागणीला पाठिंबा देण्यात आला आहे. संघटनेचे परशुराम ढगे यांनी ही मागणी रास्त असून राज्य सरकारने विणकरांसाठी प्राधिकार स्थापन करावे, अशी मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांची शुक्रवारी प्राधिकार स्थापन करणेबाबत नुतन राज्यसभा सदस्य डॉ. के. नारायण यांच्या नेतृत्वाखाली बेंगळूर चे माजी उपमहापौर हरीश आणि विणकर नेत्यांनी भेट घेतली. आणि महामंडळाची स्थापन करण्याची मागणी केली. कोरोना कालावधीत राज्यातील विणकरांची परिस्थिती दयनीय बनली आहे. राज्यभरातील विणकरांनी विणलेल्या सुमारे पंधरा लाखांहून अधिक साड्या पडून आहेत. या साड्यांची सरकारने खरेदी करावी, अशी मागणी याआधीच करण्यात आली आहे.

सरकारनेही साड्या खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही ही प्रक्रिया सुरू झाली नाही. यामुळे या साड्यांची खरेदी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. याबरोबरच राज्यातील प्रत्येक विणकर बांधवाना पाच हजार रुपयांची मदत करावी. अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT